
अन्य मान्यवरांनी व्यक्त केलेली मते
१. श्री. शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समिती - वर्ष १९४७ पासून
पाकिस्तान भारताचा शत्रू आहे. युद्धात जेवढे सैनिक मारले गेले, त्यापेक्षा
अधिक सैनिक आतंकवादी आक्रमणात मारले गेले. पाकिस्तानवर आक्रमण करायला हवे.
आतंकवाद कसा संपवावा, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासमोर
ठेवला आहे. त्याप्रमाणे आता शासनाने कृती करण्याची वेळ आली आहे. २. अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर, विश्व हिंदु परिषद - कालचे आक्रमण हे धर्मांधांनी हिंदूंवर केलेले आक्रमण आहे. धर्मांध पाकिस्तानातून येऊन आक्रमण करत आहेत. भाजपला बहुसंख्य हिंदूंनीच निवडून दिले आहे, हे पंतप्रधानांनी लक्षात ठेवावे.
३. डॉ. अविनाश शिंदे, श्रीशिवप्रतिष्ठान - धर्मनिरपक्षतेचे धोरण कुचकामी ठरले आहे. आता हिंदु राष्ट्रच घोषित करावे.
४. श्री. संजय कुलकर्णी, हिंदु महासभा, प्रदेश उपाध्यक्ष - भारतात आतंकवाद का फैलावतो, हे शोधणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समिती प्रत्येक आंदोलन देशहितासाठीच करते.
५. श्री. अवधूत भाट्ये, वन्दे मातरम् यूथ ऑर्गनायझेशन - पाकिस्तान हा प्रत्येक आतंकवादी आक्रमणामागे असतो, हे उघड झाले आहे. पंतप्रधानांनी आता एकदाचा काय तो पाकिस्तानला धडा शिकवावा.
६. श्री. सुनील पाटील, पतित पावन संघटना, जिल्हाध्यक्ष - जे सैनिक हुतात्मा झाले, ते सर्व हिंदु होते. अन्य धर्मीय येथेच रहातात, येथेच खातात; मात्र त्यांना भारतमाता की जय म्हणण्यास लाज वाटते. हे कधी राष्ट्ररक्षणासाठी एकत्र येत नाहीत.
७. श्री. शरद माळी, श्रीशिवप्रतिष्ठान - पाकड्यांना धडा शिकवा. आता गावागावांत अशी आंदोलने होणार आहेत.
क्षणचित्रे
१. अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर यांनी हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावे
वाचून दाखवली. त्या वेळी सर्वांनी जय श्रीराम अशी घोषणा दिली. २. वीर जवानांचा विजय असो !, मुर्दाबाद-मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद ! जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो !, अशा घोषणा देण्यात आल्या, तर नको निषेध, नको श्रद्धांजली, आता करा थेट कारवाई !, नष्ट करा, नष्ट करा, पाकिस्तान नष्ट करा !, मोदीजी युद्ध करा, युद्ध करा !, अशी वाक्ये लिहिलेले फलक हातात धरण्यात आले होते.
Post a Comment