BREAKING NEWS

Sunday, May 21, 2017

उत्तराखंड येथील चारधाम यात्रेला गेलेले महाराष्ट्रातील यात्रेकरु सुरक्षित - मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस


मुंबई,- : उत्तराखंड राज्यातील विष्णू प्रयागला झालेल्या भूस्खलनामुळे चारधाम यात्रेला गेलेल्या महाराष्ट्रातील 179 यात्रेकरु अडकले आहेत. तेथे कोणतीही जिवीत व वित्तहानी झालेली नाही. राज्य शासन स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून सर्व यात्रेकरु सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती दिली.
या यात्रेकरुंमध्ये 179 यात्रेकरु महाराष्ट्रातील असून यापैकी औरंगाबाद (102), पुणे (38), सांगली (33), जळगाव (6) या यात्रेकरुंचा समावेश असून सर्व यात्रेकरु सुखरुप आहेत. उत्तराखंडच्या चार्मोली जिल्हाधिकारी यांच्याशी या संबंधी बोलणे झाले आहे.
हा रस्ता दुपारी 3 वाजता चालू होणार आहे. त्यानंतर अडकलेल्या यात्रेकरुंना रेल्वे स्टेशनला आणून त्या ठिकाणाहून रेल्वेने त्यांना महाराष्ट्रात परत आणले जाणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.