चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)-
राज्यातील संपूर्ण अंध-अपंग लोकांना अद्यापही आधार योजनेचा लाभ मिळाला नसल्याने हजारो अंध-अपंग लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहे. त्यामुळे तात्काळ आधार योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी आज चांदुर रेल्वे येथील तहसीलदार यांना प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
राज्यातील अंध-अपंग लाभार्थी आधीच मानसिक खचलेले असतांना त्यांना अद्यापही शासनाच्या योजनांचा पाहिजे तसा लाभ मिळत नाहीये. योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर आता आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. अशातच तालुक्यातीलच नव्हेतर संपूर्ण राज्यातील अंध-अपंग लाभार्थ्यांना अद्यापही आधार कार्ड योजनेचा लाभ मिळालेला नाहीये.
शासनाच्या अनेक लोकपयोगी हिताच्या अंध-अपंगांच्या योजना असतांनाही त्याचा लाभ अंध-अपंग घेत नसल्याने त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आधार कार्ड ही अट अडसर ठरत आहे. त्यामुळे शासनाने आता एकतर हि आधार कार्डची अट शिथिल करावी अन्यथा अंध-अपंगांना तात्काळ आधार कार्ड योजनेचा लाभ घ्यावा अशी मागणी केल्या जात आहे.
यासाठी चांदुर रेल्वे तालुक्यात प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी किरण गित्ते, तर आधार क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस संदीप सोळंके, महिला तालुकाध्यक्षा मालिनीताई वाघ, अक्षय जामदार, राहुल शेळके, प्रशांत सिसोदिया, सुधीर शेळके, प्रल्हादराव चौधरी, नीलकंठ निहाटकर, अवदुतराव मेश्राम, बबनराव मोहोड, प्रदीपराव नेहटकर, विलास पाटील, विजय चतुर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती..
राज्यातील संपूर्ण अंध-अपंग लोकांना अद्यापही आधार योजनेचा लाभ मिळाला नसल्याने हजारो अंध-अपंग लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहे. त्यामुळे तात्काळ आधार योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी आज चांदुर रेल्वे येथील तहसीलदार यांना प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
राज्यातील अंध-अपंग लाभार्थी आधीच मानसिक खचलेले असतांना त्यांना अद्यापही शासनाच्या योजनांचा पाहिजे तसा लाभ मिळत नाहीये. योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर आता आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. अशातच तालुक्यातीलच नव्हेतर संपूर्ण राज्यातील अंध-अपंग लाभार्थ्यांना अद्यापही आधार कार्ड योजनेचा लाभ मिळालेला नाहीये.
शासनाच्या अनेक लोकपयोगी हिताच्या अंध-अपंगांच्या योजना असतांनाही त्याचा लाभ अंध-अपंग घेत नसल्याने त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आधार कार्ड ही अट अडसर ठरत आहे. त्यामुळे शासनाने आता एकतर हि आधार कार्डची अट शिथिल करावी अन्यथा अंध-अपंगांना तात्काळ आधार कार्ड योजनेचा लाभ घ्यावा अशी मागणी केल्या जात आहे.
यासाठी चांदुर रेल्वे तालुक्यात प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी किरण गित्ते, तर आधार क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस संदीप सोळंके, महिला तालुकाध्यक्षा मालिनीताई वाघ, अक्षय जामदार, राहुल शेळके, प्रशांत सिसोदिया, सुधीर शेळके, प्रल्हादराव चौधरी, नीलकंठ निहाटकर, अवदुतराव मेश्राम, बबनराव मोहोड, प्रदीपराव नेहटकर, विलास पाटील, विजय चतुर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती..

Post a Comment