कार्वे, तालुका कराड
येथे हिंदु धर्मजागृती सभा
ते पुढे म्हणाले...
१. हिंदूंनो, तुम्ही एका हातात कोणत्याही पक्षाचे झेंडा घेतला असेल, तरी चालेल; परंतु उजव्या हातात फक्त भगवाच असला पाहिजे. तुम्ही शेळी नसून तुम्ही वाघ आहात, हे लक्षात ठेवा !
२. हिंदु जनजागृती समितीचे कार्य स्तुत्य आहे. उंब्रज, तालुका कराड येथील गोरक्षकांचे सत्कार करून त्यांनी आमचे धैर्य वाढवले आहे.
३. गायींचे रक्षण करणे काळाची आवश्यकता आहे. जर गायी संपल्या, तर हिंदु धर्म संपेल.
काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन
न होणे हे दुर्दैवी ! - राहुल कोल्हापुरे
आज सनातनच्या साधकांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सनातन संस्था सूर्यप्रकाशाइतकी निर्दोष आहे. जनतेने काँग्रेस सरकारचा सत्तेवरून उतार केला; पण भाजप सरकारही तडजोड करत आहे. अजूनही आपण काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करू शकलेलोे नाही, हे दुर्दैवी आहे. अयोध्या राममंदिराचा विषय केवळ निवडणुकीपुरताच येतो. त्याच्या पुर्ततेची जनता वाट पहात आहे.

Post a Comment