BREAKING NEWS

Wednesday, May 17, 2017

(म्हणे) ‘अयोध्येत भगवान श्रीरामांचा जन्म झाला, ही हिंदूंची श्रद्धा आहे, तशीच मुसलमानांची तोंडी तलाकविषयी आहे’

नवी देहली – 


भगवान श्रीराम यांचा अयोध्येत जन्म झाला, अशी हिंदूंची आस्था आहे तशीच आस्था तोंडी तलाकच्या संदर्भात मुसलमानांची आहे. रामावरील हिंदूंच्या आस्थेवर शंका घेता येत नाही, तर मग तिहेरी तलाकवर प्रश्‍न का ?, असा प्रश्‍न काँग्रेसचे नेते आणि अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात तोंडी तलाकवरील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित केला. तोंडी तलाकची पद्धत १ सहस्र ४०० वर्षांपासून आहे. मग या पद्धतीला बिगरइस्लामी म्हणणारे आपण कोण? तुम्ही तोंडी तलाक घटनाबाह्य कसे म्हणू शकता, असे प्रश्‍नही सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली. तीन तलाक अमान्य झाल्यास नवीन कायदा करण्याच्या केंद्र सरकारच्या वक्तव्यावरूनही सिब्बल यांनी प्रश्‍न उपस्थित केले.
इस्लाममध्ये ‘ई-तलाक’ आणि ‘व्हॉट्स अ‍ॅप’द्वारे दिलेल्या तलाकची जागा काय आहे ?, असा प्रश्‍न न्यायालयाने या वेळी पर्सनल लॉ बोर्डला विचारला. त्यावर कपिल सिब्बल यांनी बोर्डाची बाजू मांडली. श्रद्धेच्या विषयात न्यायालयाने हस्तक्षेप करू नये. तोंडी तलाक समानतेशी संबंधित सूत्र नाही. हा श्रद्धेचा विषय आहे; मग न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये. निकाह आणि तलाक हे एकमेकांशी जुळलेले आहेत, तर दुसर्‍यांना हे खूपण्याचे कारण काय ?, असा प्रश्‍न सिब्बल यांनी केला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.