BREAKING NEWS

Friday, January 20, 2017

अवैध प्रवासी वाहतूक झाली ‘सैराट’! अवैध वाहतूक जोमात आणि वाहतूक पोलिस कोमात


चांदुर रेल्वे- - (शहेजाद  खान)-




अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मनमानी अजुनही सुरूच आहे. नंबरला लावलेले वाहन पंधरा प्रवासी बसविल्याशिवाय पुढे सरकत नाही. वाटेत मिळाले, तर आणखी प्रवासी पायऱ्यांवर उभे केले जातात. चांदुर रेल्वे शहरात येणाऱ्या काळी-पिवळी, व्हैन, मेटाडोरमध्ये मेंढरे
भरल्यागत माणसे कोंबलेली असतात. मात्र याकडे ना कोण्या वाहतूक शाखेच्या पोलिसांचे लक्ष जाते ना हद्दीतील ठाण्यांचे. व्यवस्थेचे अंकुश नसल्याने शहरभरात अवैध प्रवासी वाहतूकदारांचा हैदोस सुरु असल्याचे नुकतेच केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे.



गेल्या काही दिवसांपासून चांदुर रेल्वे शहरात अवैध प्रवासी वाहतूकीचे प्रमाण वाढू लागल्याने वाहतूक पोलिस नेमके करतात तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे. चांदुर रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये वाहतूक पोलिस म्हणून अधिकृतपणे २ ते ३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली
असूनही हे पोलिस नेमके काय काम करतात
करतात, याविषयी लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा
आहे. नेमणूक एकीकडे तर काम दुसरीकडे केले जात असल्याने अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कुणाचाच धाक राहिला नाही. त्यामुळे एक- एक वाहनधारक दिवसभरात चार-चार, पाच-पाच खेपा करतात. यावरून चांदुर रेल्वे  वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
        चांदुर रेल्वे शहरातुन अमरावती, कुऱ्हा, मालखेड, धामणगाव, देवगाव येथे  जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतुक केली जाते. अवैध प्रवासी वाहतूक करत असताना
वाहनधारक पैसा मिळविण्याच्या हेतूने आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी त्याचप्रमाणे
वाहनाला लटकवत भरत असतो. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना सुरक्षा मिळेल का नाही? या प्रश्नांचे वाहनधारकांसह व पोलिसांना देणे घेणे
नाही की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अतिरिक्त प्रवासी संख्येमुळे वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध प्रवाशी वाहतूक करणारे वाहनधारक
एस.टी.बस येण्याच्या कांही मिनिटांपूर्वीच आपली वाहने प्रवाशांनी खचाखच भरुन आपआपल्या दिशेने थाटात रवाना होतात. यामुळे एस.टी. प्रशासनाला चुना तर लागतोच शिवाय नागरिकांनाही आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूकीस वेळीच आळा घालून त्यांच्या व वाहनधारकात सुरु असलेले मित्रत्वांच्या संबंधांना अबाधित न ठेवता त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करून शासनाचा फायदा करून द्यावा एवढीच अपेक्षा.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.