BREAKING NEWS

Tuesday, May 30, 2017

देशातील निधर्मीवादी संघटना आता गप्प का ? – श्री योगी आदित्यनाथ

केरळमधील गोहत्येचे प्रकरण


लक्ष्मणपुरी – केरळमध्ये गुरांच्या संदर्भातील कायद्याला विरोध करतांना माकप आणि काँग्रेस यांच्याकडून गोमांस मेजवानी करण्यात आली. त्यावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे. देशातील निधर्मीवादी संघटना आता गप्प का आहेत, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकारचा एक आदेश लागू झाल्यावर गोमांस मेजवानी देण्यात आली. मला वाटते की, देशात एकमेकांच्या भावनांना सन्मान देण्याची गोष्ट नेहमीच केली जाते आणि यात निधर्मीवादी संघटना नेहमीच पुढे असतात; मात्र केरळमधील घटनेनंतर ते गप्प का आहेत, हे मला अद्याप समजलेले नाही. ते सर्व या सूत्रावर मौन आहेत.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.