महेंद्र महाजन जैन / रिसोड -
सेनगांव:- सेनगांव शहराजवळील मकोडी पाटीवर गणेश मंदिराजवळील संत नामदेव कृषी बाजारात हळदीला चांगला भावा मिळत असल्याने शेतक-यांनी आपली हळद संत नामदेव कृषी बाजारात विक्रीस आनावी असे आवाहन समितीचे विश्वस्त तथा माजी जि.प.सदस्य व्दारकादासजी सारडा यांनी केले आहे.
शेतक-यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा याच उद्देशाने संत नामदेव कृषी बाजाराची स्थापना केली असुन आता पर्यंत शेतक-यांच्या शेतीमालाला या बाजारामध्ये चांगला भाव मिळाल्याने सेनगांव तालुक्यासह जिंतुर, हिंगोली, विदर्भातुन शेतकरी आपला शेतीमाल संत नामदेव कृषी बाजारात घेऊन येत आहेत. यावर्षी सोयाबिनला सुध्दा चांगला भाव होता. संत नामदेव कृषी बाजारात आठ दिवसापुर्वी हळद खरेदीला सुरुवात झाली असुन भाव ही चांगला मिळत असल्याने दुरवरुन शेतकरी आपली हळद घेऊन येत आहेत. आज दि.०१ मे सोमवार रोजी हळदीला ५००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. संत नामदेव कृषी बाजार शेतक-यांचे हित जोपासुनच भाव देत असल्याने दुरवरुन शेतकरी आप आपला शेतीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीस आनत आहेत. शेतक-यांचे हित लक्षात घेता संत नामदेव कृषी बाजारात हळद खरेदीला सुरुवात केली असुन या बाजारात शेतक-यांनी आपली हळद विक्रीस आनावी असे आवाहन संत नामदेव कृषी बाजार चे संचालक तथा माजी जि.प.सदस्य व्दारकादासजी सारडा व गिरीधारजी तोष्णीवाल यांनी केले आहे.
शेतक-यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा याच उद्देशाने संत नामदेव कृषी बाजाराची स्थापना केली असुन आता पर्यंत शेतक-यांच्या शेतीमालाला या बाजारामध्ये चांगला भाव मिळाल्याने सेनगांव तालुक्यासह जिंतुर, हिंगोली, विदर्भातुन शेतकरी आपला शेतीमाल संत नामदेव कृषी बाजारात घेऊन येत आहेत. यावर्षी सोयाबिनला सुध्दा चांगला भाव होता. संत नामदेव कृषी बाजारात आठ दिवसापुर्वी हळद खरेदीला सुरुवात झाली असुन भाव ही चांगला मिळत असल्याने दुरवरुन शेतकरी आपली हळद घेऊन येत आहेत. आज दि.०१ मे सोमवार रोजी हळदीला ५००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. संत नामदेव कृषी बाजार शेतक-यांचे हित जोपासुनच भाव देत असल्याने दुरवरुन शेतकरी आप आपला शेतीमाल मोठ्या प्रमाणात विक्रीस आनत आहेत. शेतक-यांचे हित लक्षात घेता संत नामदेव कृषी बाजारात हळद खरेदीला सुरुवात केली असुन या बाजारात शेतक-यांनी आपली हळद विक्रीस आनावी असे आवाहन संत नामदेव कृषी बाजार चे संचालक तथा माजी जि.प.सदस्य व्दारकादासजी सारडा व गिरीधारजी तोष्णीवाल यांनी केले आहे.

Post a Comment