द्वारकानगरीत चतुर्थ अखिल भारतीय पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाला प्रारंभ !
![]() |
| पंचगव्य चिकित्सा निर्देशिकेचे प्रकाशन करतांना मान्यवर |
श्री. मनसुखभाई सुवागीया पुढे म्हणाले, भारतात सर्वत्र गीर गायी पाळणे योग्य नाही. भगवंताने त्या त्या भूभागासाठी वैशिष्ट्यपूर्ण गायी निर्माण केल्या आहेत. आज भारतीय गायींच्या १० हून अधिक प्रजाती प्रतिदिन प्रत्येकी १५ लिटरपेक्षा अधिक दूध देऊ शकतात; पण सरकार देशी गायींच्या खच्चीकरणासाठी देशी गायी फार अल्प दूध देतात, असा अहवाल देत आहे. भारतीय जनतेला डॉबरमॅन, आल्सेसियन आदी कुत्र्यांच्या विदेशी प्रजातींची नावे माहीत आहेत; परंतु भारतीय वंशाच्या गायींच्या प्रजातींची नावे माहीत नाहीत, ही शोकांतिका आहे. केवळ गीर गायीच्याच मूत्रामध्ये सोने असते, असे नाही, तर सर्वच भारतीय गायींच्या मूत्रात सोने आढळते. शेतकर्याने त्याच्या स्थानिक शुद्ध देशी प्रजातीच्या गायीचे ५० ग्रॅम वाळवलेले शेण, १०० मिली गोमूत्र आणि ५० मिली तूप माझ्या पत्त्यावर पाठवल्यास मी त्याची प्रयोगशालेय परीक्षणे करून शेतकर्याला अहवाल पाठवून देईन.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात सूर्ययोगी उमाशंकरजी यांनीही मार्गदर्शन केले, तसेच त्वरित ऊर्जा देणार्या काही श्वसनक्रिया उपस्थितांकडून करवून घेतल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मा यांनी केले. या वेळी गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मा यांच्या २ ग्रंथांचे, तसेच त्यांच्या व्याख्यानांच्या पेन ड्राइव्हचे प्रकाशन करण्यात आले.
मनसुखभाई यांनी केलेले कार्य
मनसुखभाई यांनी ५ वर्षे स्वतः श्रमदान करून, तसेच सौराष्ट्रातील शेतकर्यांना संघटित करून कोणत्याही शासकीय यंत्रणांच्या साहाय्याविना ३०० गावांत ३ सहस्र बंधारे बांधले. यामुळे पूर्वी ७०० फूट खोलही जेथे पाणी सापडत नव्हते, अशा ठिकाणी आता सर्व कूपनलिका पाण्याने भरून गेल्या आहेत. २००३ या वर्षी गुजरात राज्यात गीर गायी नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. मनसुखभाई यांनी स्वतः गीर गाय हमारे आंगनमें (गीर गाय आमच्या अंगणात) ही योजना चालू करून गुजरातच्या १२ सहस्र गोपालकांना गोपालनासाठी उद्युक्त केले. याचा परिणाम म्हणून २००३ पासून आजपर्यंत गुजरात राज्यात गीर गायींची संख्या ५ सहस्रांवरून २ लक्ष झाली आहे.
