◆अनिल चौधरी /
पुणे ◆
आंब्याचा हंगामा सुरु होऊन दीड-दोन उलटले तरी सर्वसामान्यांना अजुनही
मनसोक्तपणे आंबे चाखता आले नाहीत. आंब्यांचे भाव आवाक्यत नसल्याने सर्व
सामान्य नागरिकांना आंबे अजूनही आंबाटच लागत आहेत. छत्रपती शिवाजी मार्केट
यार्डमध्ये रत्नागिरी हापुस आंब्यांचे भाव सध्या 4 डझनाच्या पेटीला 2 ते 3
हजारांच्या जवळपास आहेत. तर कर्नाटक हापुस 1ते 2 हजारांच्या दरम्यान आहे.
किरकोळ विक्री तर यापेक्षा जास्त दराने होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे
आहे.
अर्धा हंगामा उलटला तरी पुण्यात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली
नाही. त्यामुळे भाव अजुन कमी झाले नाहीत. गारपीठ आणि अवकाळी पावसाचा फटका
यावर्षी आंब्यांच्या हंगामावर झाल्याचे शेतकरी सांगतात. "आमच्या सध्या 100
पेटी आंबा आहे. मे महिन्यात आंब्यांची आवक वाढल्यावर भाव कमी होतील. भाव
जास्त असल्याने सध्या मार्केट डाउन आहे" असं मार्केट यार्डातील आंब्यांचे
व्यापारी पांडुरंग भोईबार म्हणाले. आंब्यांचे भाव अवाक्यात येण्यासाठी आणि
सर्व समांन्यांना ग्राहकांना मनसोक्त आंबे चाकण्यासाठी अजुन 15 दिवसांची
वाट पहावी लागणार आहे.
Hapus Mango News
|
|
Thursday, April 21, 2016
सर्वसामांन्यांसाठी आंबे अजूनही आंबटच
Posted by vidarbha on 2:56:00 PM in http://vidarbha24news.com/ | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment