BREAKING NEWS

Thursday, April 21, 2016

सर्वसामांन्यांसाठी आंबे अजूनही आंबटच

◆अनिल चौधरी / पुणे ◆ आंब्याचा हंगामा सुरु होऊन दीड-दोन उलटले तरी सर्वसामान्यांना अजुनही मनसोक्तपणे आंबे चाखता आले नाहीत. आंब्यांचे भाव आवाक्यत नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना आंबे अजूनही आंबाटच लागत आहेत. छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रत्नागिरी हापुस आंब्यांचे भाव सध्या 4 डझनाच्या पेटीला 2 ते 3 हजारांच्या जवळपास आहेत. तर कर्नाटक हापुस 1ते 2 हजारांच्या दरम्यान आहे. किरकोळ विक्री तर यापेक्षा जास्त दराने होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अर्धा हंगामा उलटला तरी पुण्यात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली नाही. त्यामुळे भाव अजुन कमी झाले नाहीत. गारपीठ आणि अवकाळी पावसाचा फटका यावर्षी आंब्यांच्या हंगामावर झाल्याचे शेतकरी सांगतात. "आमच्या सध्या 100 पेटी आंबा आहे. मे महिन्यात आंब्यांची आवक वाढल्यावर भाव कमी होतील. भाव जास्त असल्याने सध्या मार्केट डाउन आहे" असं मार्केट यार्डातील आंब्यांचे व्यापारी पांडुरंग भोईबार म्हणाले. आंब्यांचे भाव अवाक्यात येण्यासाठी आणि सर्व समांन्यांना ग्राहकांना मनसोक्त आंबे चाकण्यासाठी अजुन 15 दिवसांची वाट पहावी लागणार आहे. Hapus Mango News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.