BREAKING NEWS

Saturday, May 6, 2017

शेतकऱ्यांची तुर खरेदी व्यवस्थित व्हावी म्हणुन पटवारी, मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती तहसिलदारांचा असाही कर्तव्यदक्षपणा

चांदुर रेल्वे - (शहेजाद  खान)



भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील ७०% लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात . इतिहासात डोकावून पाहिले तर बी पडून वनस्पती उगवते हे माणसाने पाहिले आणि त्याची शेती सुरु झाली. हा शोध जगातील महत्वाच्या शोधापैकी एक आहे. यामुळे माणसाची जीवनपद्धती बदलून गेली. शेतीचा शोध लागल्यापासून आजतागायत जगात सगळीकडे शेती हा व्यवसाय प्रामुख्याने चालत आला आहे. शेतीला हजारो वर्षाची समृद्ध परंपरा असताना हि आजची आपली शेती अडचणीत आहे. दिवसभर घाम गाळुन कसाबसा पीक शेतकरी घेत आहे. मात्र ते पिक विकण्यासाठीही स्थानिक बाजार समितीत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपल्या कर्तव्यदक्षतेचा परीचय देत तहसिलदार बी.ए. राजगडकर पुढे आले आहे.
      सद्यस्थितीत सायंकाळी ढगाळ वातावरण निर्मान होत असुन कधीही अवकाळी पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी शेडचे बांधण्यात आले आहे. मात्र या शेडमध्ये अनेक दिवसांपासुन व्यापाऱ्यांचाच माल ठेवण्यात आला आहे. अनेकवेळा सांगुनसुध्दा अद्यापही शेड व्यापाऱ्यांनी खाली केला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची जी तूर उघड्यावर पडली आहे त्या तुरीच्या सरंक्षणासाठी तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या हक्काचे ओटे आणि शेड लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मालासाठी रिकामे करण्यात यावे, तहसीलदार यांनी 22 एप्रिल रोजीच्या आधीच्या आलेल्या तुरीची खरेदी करण्यात आल्याचे निर्देश दिले पण त्यानंतरही शेतकऱ्यांचा हजारो पोते तूर मार्केट मध्ये पडली आहे, मात्र ती खरेदी होत नसल्याने ती तुरही खरेदी करून घ्यावी, खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे शेतकऱ्यांना तात्काळ पैसे द्यावे आदी मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चेतन इंगळे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तसेच यावेळी बाजार समितीत  संचालकांचे, पदाधिकाऱ्यांची तूर शेतकऱ्याच्या मालाच्या आधी विकत घेत असुन यामध्ये जगदीश आरेकर यांची तूर 21 एप्रिल रोजी मार्केट मध्ये आणली होती पण त्याच्या आधी आणलेल्या शेतकऱ्यांच्या तुरी मात्र अजूनही विकत घेतल्या नाही. परंतु जगदीश आरेकर यांची तूर मोजण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांची ओरड लक्षात घेता तहसिलदार बी.ए. राजगडकर यांनी गुरूवारी बाजार समितीत सायंकाळी 7 वाजतापर्यंत स्वत:  उपस्थित राहून बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची तूर खरेदी करून मोजमाप करवुन घेतले. तसेच आता शुक्रवारपासुन दररोज बाजार समितीत शेतकऱ्यांची तुर खरेदी व्यवस्थीत व्हावी म्हणून महसुल विभागातील दोन पटवारी व मंडल अधिकारी यांची नियुक्ती तहसिलदारांनी केली. त्यामुळे सद्या स्थानिक बाजार समितीत चांगल्या पध्दतीने तुर मोजणी सुरू असल्याचे समजते.

तहसिलदारांचे सोशल मिडीयावर अभिनंदन

तुर खरेदीसाठी संपुर्ण जिल्ह्यातील बाजार समितीत दररोज आंदोलने, भांडण- तंटे होत आहे. अशातच शोतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणारे शहरातील तहसिलदार बी.ए. राजगडकर हे पहिले कर्तव्यदक्ष अधिकारी ठरले आहे. शेतकऱ्यांप्रती अशा चांगल्या कार्यामुळे त्यांच्यावर सोशल मिडीयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.