नगर, - राज्य सरकारने शेतकरी विरोधी कायदे रहित
करावेत, तसेच राज्य सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा केल्याने
शेतकर्यांच्या पशुधनावर गदा आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना भाकड आणि
निरुपयोगी जनावरे संभाळावी लागत आहेत. कायदा झाल्याने कुरेशी समाजावर
उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा रहित करा, अन्यथा
नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असे विधान
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केले आहे. त्यांच्या
नेतृत्वाखाली येथील ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी
संघटना आणि कुरेशी समाज यांच्यासमवेत शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी
२६ सप्टेंबर या दिवशी मोर्चा काढण्यात आला. या वेळी कुरेशी समाज मोठ्या
संख्येने उपस्थित होता.
Tuesday, September 27, 2016
(म्हणे) गोवंश हत्या बंदी कायदा रहित करा ! शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांचे गोद्रोही विधान !
Posted by vidarbha on 9:30:00 PM in नगर | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment