BREAKING NEWS

Monday, November 21, 2016

हिंदु धर्म सोडून गेलेल्यांना हिंदु धर्माविषयी बोलण्याचा अधिकार नाही ! - ह.भ.प. भगवान महाराज कोकरे


 ‘हिंदु धर्मावर होणारे आक्षेप आणि त्याचे खंडण’ याविषयी ह.भ.प. भगवान महाराज कोकरे म्हणाले, ‘‘कोकणाने हिंदवी स्वराज्य दिले. भारताच्या स्वातंत्र्याची ठिणगीदेखील कोकणातच पडली. त्याचप्रमाणे हिंदु जनजागृती समितीची स्थापना कोकणातच म्हणजे चिपळूणमध्ये झाली. सर्व धर्मांची जननी हिंदु धर्म आहे. 
     पंतप्रधान मोदींनी ‘जय श्रीराम’ म्हटले, तर धर्मद्रोह्यांनी देशात हाहाकार माजवला; मात्र ‘भारतमाता की जय’ न म्हणणार्‍यांच्या विरोधात हे धर्मद्रोही काहीच बोलत नाहीत. ज्या शासनाने हिंदु धर्मविरोधी अंधश्रद्धा कायदा पारित केला, ते शासन पुढे एक वर्षही सत्तेत राहिले नाही. हिंदूंच्या विरोधात काम कराल, तर हिंदू स्वत:ची शक्ती दाखवतील. सनातन संस्थेने वाईट काम केलेले नाही, करत नाही आणि पुढे करणारही नाही; मात्र सनातनच्या विरोधातील बातमी छापण्यासाठी सर्व पीतपत्रकार पुढे येतात. जे हिंदु धर्म सोडून गेले आहेत त्यांना आमच्या धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही. आम्हाला कलंकित करणारेच पुढे कलंकित होतील. सनातन संस्था हा संप्रदाय नाही, तर ती हिंदु धर्माचे कार्य करणार्‍याचा सेनापती आहे.’’ 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.