![]() |
| प्रा. आेंकार जरळी |
अधिवेशनात ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ या विषयावर प्राध्यापक आेंकार जरळी म्हणाले, ‘‘प्राचीन काळापासून वातावरणातील इष्ट आणि अनिष्ट शक्तींचा लढा चालू आहे. ‘एक व्यक्ती धर्मांतरित झाली, तर केवळ एक हिंदु अल्प होत नाही, तर एक शत्रूही निर्माण होतो’, असे स्वामी विवेकानंद यांचे वचन आहे. आज हिंदूंच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. लहान गावांमधील अशिक्षित हिंदूंना नोकरीचे आमीष दाखवून मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर केले जाते. काही राज्यांमध्ये धर्मांतरण होण्यासाठी शासनच उत्तरदायी आहे. हिंदूंचे धर्मांतर होण्याला आपणच कारणीभूत आहोत. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता उपाययोजना करायलाच हवी ! हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदु कन्येचे आणि तिच्या मातापित्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे छुपे युद्ध असून त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’

Post a Comment