एक भारत अभियान - कश्मीर की ओर उपक्रमाच्या अंतर्गत
लक्ष्मणपुरी येथे हिंदु धर्मजागृती सभेतील मान्यवरांचे उद्बोधक विचार
लक्ष्मणपुरी येथे हिंदु धर्मजागृती सभेतील मान्यवरांचे उद्बोधक विचार
विद्यमान सरकार काश्मीरमधील ३७० कलम रहित करण्यासाठी काही
प्रयत्न करणार आहे का ? ३७० कलमाच्या अंतर्गत जर काश्मीरमधील मुलींनी अन्य
प्रांतातील मुलासमवेत विवाह केला, तर तिचे काश्मीरचे नागरिकत्व रहित होते
आणि जर तिने पाकव्याप्त काश्मीरमधील मुलाशी लग्न केले, तर त्या मुलीच्या
काश्मीरच्या नागरिकत्वास काही धक्का लागत तर नाहीच, उलट पाकिस्तानच्या
मुलास भारताचे नागरिकत्व सहज मिळते. या कलमामुळे काश्मीर भारताचाच भाग असून
सुद्धा तिथल्या नागरिकांना शरणार्थ्यांप्रमाणे रहावे लागत आहे आणि
भारतातील अन्य प्रांतियांना काश्मीरमध्ये साधी जमीन सुद्धा विकत घेता येऊ
शकत नाही. असे कलम सुरु ठेवण्यासाठी ते काही वेगळे राष्ट्र आहे का असा
प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त
पिंगळे यांनी उपस्थितांना विचारला.
पनून कश्मीरला भारताचेच अंग म्हणून घोषित करण्यासाठी सामूहिक प्रयत्नच आवश्यक !
- अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन, संरक्षक, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस, लखनऊ
अधिवक्ता श्री. जैन यांनी मार्गदर्शनाच्या आरंभी 'इतिहास बदला है, भूगोल बदलेंगे, दुश्मन के फन को कुचलेंगे ।'
या काव्यपंक्ती सादर केल्या. ते पुढे म्हणाले, संविधानिक चौकटीत राहून
सध्याच्या सर्व समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो आणि तोच प्रयत्न आम्ही
आमच्या संघटनेच्या माध्यमांतून करत आहोत. कलम ३७० रहित होण्यासाठी, तसेच
सरकारी संस्थांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये काश्मिरी हिंदूंना नोकर्या
मिळण्यासाठी सरकार काही योजना आखणार का? पनून कश्मीर (आपले काश्मीर)
भारताचेच अंग म्हणून घोषित करण्यासाठी सामूहिक प्रयत्नच केले पाहिजेत.
आजतागायत सरकार हिंदूंच्या कराचे पैसे मुसलमानांनच्या धार्मिक सुविधांसाठी
वापरते, ते थांबवण्यासाठी संघर्ष करण्याची आमची सिद्धता आहे.
हिंदूंमधील संघटितपणाच्या अभावामुळेच इस्लामी कट्टरतावाद सर्वत्र पसरला आहे !
- अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, वाराणसी
सर्व जीव-जंतू स्वतःच्या सुरक्षेसाठी समूहाने रहातात; मात्र
सुरक्षेचे हे नैसर्गिक सूत्र हिंदु समाज प्रतिकारासाठी वापरायचे विसरून
गेला आहे. यामुळेच इस्लामी कट्टरवाद आज हिंदुस्थानात सर्वत्र पसरत आहे आणि
त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतांतून हिंदूंना घर सोडून पलायन करावे लागत आहे.
काश्मीर याचेच उत्तम उदहरण आहे. काश्मीरमधील हिंदूंचा जेव्हा वंशविछेद
करण्यात आला, तेव्हा मुसलमानांना ठाऊक होते की, हिंदू त्यांचा सामूहिक
प्रतिकार करूच शकणार नाहीत आणि त्याचेच आज काश्मिरी पंडितांना फळ भोगावे
लागत आहेत.
काश्मिरी हिंदूंची समस्या ही आपली समस्या आहे, ही भावना
सर्व हिंदूंमध्ये निर्माण झाली पाहिजे ! - श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच, ओडिशा
सर्व हिंदूंमध्ये निर्माण झाली पाहिजे ! - श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच, ओडिशा
एक भारत अभियान - कश्मीर की ओर या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही
मागील ६ महिन्यांपासून भारतभरातील अनेक राज्यांमध्ये हिंदु धर्मजागृती सभा
घेत आहोत. याचे एकमेव कारण म्हणजे काश्मिरी हिंदूंची समस्या ही केवळ
त्यांची समस्या नसून आपल्या सर्वांची आहे, ही भावना सर्वांमध्ये निर्माण
झाली पाहिजे.
काश्मीर आणि अन्य समस्यांसाठी संघटित होण्याला पर्याय नाही !
- श्री. कौशल किशोर, अनुसूचित जाती प्रकोष्ट अध्यक्ष, भाजप
कट्टर पंथियांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी पारसी समुदायाने
युक्तीचा वापर केला. आज काश्मीर आणि अन्य समस्यांसाठी संघटित होऊन एक ठोस
उपाय काढण्यावाचून आपल्याकडे पर्याय नाही.
गेल्या २६ वर्षांमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन होऊ न शकणे, हे लज्जास्पद !
- श्री. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्था, वाराणसी
काश्मीर आपल्या पूर्वजांची संपत्ती आहे; कारण काश्मीर ही कश्यप ऋषींची
भूमी आहे. करोडो हिंदूंचे गोत्र हे कश्यप आहे, ज्यांचे गोत्र माहित नसते,
त्यांचे सुद्धा गोत्र कश्यप मानले जात. आम्हा हिंदूंची श्रद्धा आहे की,
सगळ्या जिवांची निर्मिती कश्यप ऋषींपासून झाली आहे. गेल्या २६ वर्षांमध्ये
काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन होऊ शकले नाही, हे लज्जास्पद आहे, ही गोष्ट
लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.

Post a Comment