कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला ह.भ.प. क्षीरसागर महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि महर्षी यांच्या संदेशाचे वाचन ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. वैभवी भोवर यांनी केले. या वेळी श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि कु. अश्विनी कुलकर्णी यांनी स्वसंरक्षण काळाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली.
उपस्थित हिंदुत्ववादी आणि मान्यवर : नगर महानगरपालिकेच्या महापौर सौ. सुरेखा कदम, माजी महापौर सौ. गीतांजली काळे, भाजप महिला आघाडीच्या सौ. सुरेखा विद्ये, भाजपच्या माजी नगरसेविका सौ. सुमनताई गंधे, हिंदु राष्ट्र्रसेनेचे भिंगार शहराध्यक्ष श्री. सतीश मोरे, बजरंग दलाचे उपशहरमंत्री श्री. अनिल देवराव, जिल्हा संयोजक श्री. बाली जोशी, स्वदेशीचे श्री. ताथेड, वसुंधरा वुमन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. वंदना पंडित, अखिल भारतीय छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती सुरेखा सांगळे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री संतोष पंडुरे, देविदास मुद्गल आणि पतंजली योग वर्गप्रमुख श्री. निकम आणि वर्गातील महिला साधक
Post a Comment