BREAKING NEWS

Monday, August 29, 2016

विश्‍वाला वाचवण्यासाठी आणि विश्‍वात शांती निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! - अधिवक्ता श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

नालासोपारा - हिंदु बांधव जोपर्यंत एकत्रित येत नाहीत, तोपर्यंत हिंदु राष्ट्र येणार नाही. या विश्‍वाला वाचवण्यासाठी आणि विश्‍वात शांती निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयपूर्तीसाठी हिंदू गोवंश रक्षा समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑगस्ट या दिवशी नालासोपारा (प.) येथील महाकाली मंदिराच्या सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले. अधिवेशाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत व्यासपिठावर उपस्थित होत्या.
     अधिवेशनाच्या प्रारंभी पुरोहित विजय जोशी यांनी शंखनाद आणि वेदमंत्रपठण केले. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन अधिवेशनाला आरंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश अधिवेशनात वाचून दाखवला. या वेळी संतांचा सन्मान आणि वक्ते अन्य मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशनाला सनातनच्या संत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.