ग्राहकांना २४ तासांत केव्हाही आपल्या खात्यातील पैसे काढता यावे यासाठी सगळीकडे एटीएम ची सुविधा सुरू करण्यात आली. शहरात चार राष्ट्रीयकृत बँकाचे एटीएम असुन स्टेट बँकेचे वगळता इतर एटीएम रविवारपासुन बंदच असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बँकेच्या चार भिंतींबाहेर राहून, ग्राहकास
आपल्या खात्यावरील मनी कोणत्याही मानवी
हस्तक्षेपाशिवाय एनी टाईम काढून देणारे संगणकीकृत यंत्र म्हणजे एटीएम (अॅटोमॅटिक टेलर मशीन). लोक या यंत्राला 'एनी टाईम मनी' यंत्र म्हणतात. मात्र शहरात हेच यंत्र शोभेची वास्तु बनले आहे. खात्यातील पैसे काढण्यासाठी शहरात सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक या बँकेंचे एटीएम आहे. मात्र रविवारपासुन या राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएममध्ये पैशांचा ठणठणाट जाणवत असुन एटीएम पुर्णत: बंद अवस्थेत आहे. स्टेट बँकेंचे एटीएम कधी बंद तर कधी चालु अवस्थेत असते. मात्र इतर एटीएम रविवार पासुन बंदच असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. बँकेतील गर्दी कमी करण्यासाठी व ग्राहकांना होत असलेल्या त्रासापासुन मुक्त करण्यासाठी एटीएममध्ये पुरेसे पैसे ठेवून सेवा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांनी केव्हा काढावे पैसे ?
शहरातील एटीएम बंद असल्यामुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले असतांना शाळेतील शिक्षक तसेच इतर शायकीय कर्मचाऱ्यांचीही पंचाईत झाली आहे. कर्मचाऱ्यांना एटीएमने पैसे काढणे हाच एक सुकर मार्ग आहे. मात्र रविवारसह इतरही दिवशी शहरातील एटीएम बंद असल्यामुळे कर्माचाऱ्यांनी बँकेतील पैसे कसे काढावे असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे..
Post a Comment