BREAKING NEWS

Friday, March 3, 2017

पाय घसरून विहीरीत पडल्यामुळे १५ वर्षीय बालिकेचा मृत्यु दिलावरपुर येथील घटना

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-


तालुक्यातील दिलावरपुर येथील एका १५ वर्षीय बालीकेचा पाणी भरत असतांना पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता घडली.
       प्राप्तमाहितीनुसार, चांदुर रेल्वे वरून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या ग्राम दिलावरपुर येथील राजश्री विनोद वाकडे (वय १५ वर्ष ) ही  शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता गावातीलच विहिरीवर पाणी भरायला गेली होती. मात्र पाणी भरतांना राजश्रीचा पाय घसरून ती विहिरीत पडली. या घटनेत राजश्रीचा करुण अंत झाला. दुपारी स्थानिक ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
      सदर बालीका ही स्थानिक जिल्हा परीषद शाळेमध्ये शिक्षण घेत होती. व सकाळची शाळा असल्यामुळे ती पहाटेच उठली होती. राजश्रीला  आई, वडील,१ भाऊ व १ बहिण आहे. तिच्या अचानक मृत्युमुळे कुटुंबासह गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.