
त्यांच्या मागणीला उत्तर देतांना गृहराज्य मंत्री रणजीत पाटील म्हणाले, पत्रकार सरंक्षण कायदा पुढील पावसाठी अधिवेशनात मंजूर करून लागू करण्यास सरकार प्रयत्नशिल राहिल. भारतीय जनता पार्टीने निवडणुकी दरम्यान त्यांच्या जाहिरनाम्यात सुरेश भटांच्या नावाने पत्रकारांना पेंशन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते पण ज्याप्रामाणेे त्यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेला फसविले त्याचप्रमाणे भाजपाने पत्रकारांनाही फसवित तब्बल अडीच वर्षे काढलीत पण पत्रकारांना पेंशन लागू केली नाही,असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी हाणला. पत्रकार हा नि;स्वार्थी भावनेने लोकांच्या समस्यांना न्याय देण्याकरिता लिहित असतो. ईलेक्ट्रानिक मिडीया न्युज दाखवून सत्य जनतेसमोर आणत असतात. परंतु काही असामाजिक तत्वे त्या विरोधात जिवघेणे हल्ले पत्रकारांवर करीत असतात, त्यांच्या जिवाला धोका असतो म्हणून त्वरीत पत्रकार संरक्षण कायदा 2017 सभागृहात आणावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

Post a Comment