BREAKING NEWS

Monday, April 17, 2017

पत्रकार संरक्षण कायद्याने पत्रकारांना संरक्षण मिळेल- श्री गिरीष महाजन <><> अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे जळगावात अधिवेशन संपन्न चांदुर रेल्वेच्या पत्रकारांची उपस्थिती

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-


पत्रकारांवरील हल्ले वाढत असतांना देवेंद्र फडणवीस सरकारने तत्परता दाखवून यंदा  पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला. यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळेल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले. ते जळगाव येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते.


     ते पुढे बोलतांना म्हणाले की, ग्रामीण पत्रकार ग्रामीण भागात समाजाला न्याय देण्याचे काम करतो. काही दिवसांपूर्वी माझ्या खिशातील रिवॉल्वर (बंदूक) चा मुद्दा आपल्या पत्रकारांनी उचलून धरला होता. आपली तत्परता व आपल्या  लेखणीतून जोर देऊन पत्रकार काम करतो, त्याचे कौतुक केले पाहिजे असेही ना. गिरीष महाजन यांनी यावेळी व्यक्त केले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे एकदिवसीय अधिवेशनाचे रविवारी सकाळी 11.30 वाजता कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणुन जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन हे होते  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन तर प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे, जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, खा. ए.टी. नाना पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. जलिंदर सुपेकर, अ.भा. ग्रा. पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, कार्याध्यक्ष मधुसूदन कुलथे, कैलासबाप्पू देशमुख, आ. डॉ. सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. संजय सावकारे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर,  नरेश खंडेलवाल,आ. हरिभाऊ जावळे, आ.उन्मेष पाटील, आ. शिरीष चौधरी, आ. किशोर पाटील, माजी आ. साहेबराव पाटील, जळगावचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनार आदी उपस्थित होते. सर्वप्रथम जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते अधिवेशनाचे थाटात उद्घाटन करण्यात आले.


 दरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या अधिवेशानात पुणे येथील जेष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, विजय चोरमारे, विक्रांत पाटील यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच पत्रकारांसाठी करण्यात आलेले विविध ठराव यावेळी मंजूर करण्यात आले. त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या अधिवेशनात पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या जवळपास 55 पत्रकारांना नवरत्न दर्पण पुरस्कराने सन्मानीत करण्यात आले. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ४ पत्रकारांचा समावेश होता.



      या अधिवेशनामध्ये चांदुर रेल्वे येथील अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे विदर्भ कार्यकारी अध्यक्ष युसुफ खान, तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उपाध्यक्ष धिरज नेवारे, सचिव प्रा. रविंद्र मेंढे, जिल्हा निरीक्षक बाळासाहेब सोरगिवकर, संजय मोटवानी, इरफान पठान, मंगेश बोबडे, मधुकर बावने, अमर घटारे, हनुमंत मेश्राम, सुभाष कोटेचा तसेच अमरावती जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रातील पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.