BREAKING NEWS

Thursday, May 26, 2016

महाराष्ट्रात मद्यबंदीला सुरवात कधी होणार ? - डॉ. अभय बंग

संभाजीनगर, / -



 तमिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच पहिल्या दिवशी मद्यविक्रीची ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात मद्यबंदीला कधी प्रारंभ कधी होणार, असा प्रश्‍न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रानेही पुढील ३ वर्षांत क्रमश: मद्यबंदी लागू करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
        ते पुढे म्हणाले की, प्रथम बिहारमध्ये आणि नंतर तमिळनाडूमध्ये मद्यबंदी झाली. आता महाराष्ट्रात कधी हा प्रश्‍न राज्यातील जनतेच्या मनात आहे. तमिळनाडूत मद्याचा वापर आणि त्यापासून राज्य शासनाला मिळणारा कर महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे. प्रत्येक राज्य शासनाने मद्याच्या करावर पाणी सोडणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनानेही या रक्तलांच्छित कराचा लोभ सोडावा. राज्यातील नागरिकांना पाणी हवे असून मद्य नको आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.