BREAKING NEWS

Thursday, May 19, 2016

भाजप असो कि काँग्रेस, दोघांच्या राज्यात हिंदु धर्माची अवहेलना सहन केली जाणार नाही

उज्जैन -





देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याला धर्मनिरपेक्ष करण्यात आले, ज्याचा अर्थ होतो की, कोणाताही भेदभाव केला जाणार नाही; पण हिंदूच याचे बळी पडले आहेत. सनातन धर्मावरच आघात होऊ लागले आहेत. चोहोबाजूने धर्माला तोडण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. लोकशाहीला पैशाद्वारे विकत घेतले जात आहे. या देशावर भाजप, काँग्रेस किंवा कोणाचेही राज्य असो, हिंदु धर्माची अवहेलना सहन केली जाणार नाही, अशी कडक चेतावणी द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी भारत साधू समाजाच्या अधिवेशनात वार्ताहारांशी बोलतांना दिली. या अधिवेशनात १४ ठराव संमत करण्यात आले. त्यात प्रामुख्याने अयोध्येेत श्रीराममंदिराची उभारणी, देशभरात गोहत्या बंदी अन् धर्मांतर बंदी अधिनियम करण्याची मागणी करण्यात आली.  शंकराचार्य पुढे म्हणाले, लोकांच्या मनात देव आणि धर्म यांविषयी भीती राहिली नसल्याने राष्ट्राची दुर्दशा झाली आहे. पूर्वी पाठ्यक्रमातून गीता, रामायण शिकवले जात होते, लोक धर्मपरायण होते; पण आता सरकार असे करत नाही आहे. रामायण मालिकेतून देशातील युवकांच्या मनावर मोठा सांस्कृतिक प्रभाव निर्माण झाला होता; पण त्याचा धर्मरक्षणासाठी वापर न करता त्याला राजकारणात वळवण्याचा प्रकार करण्यात आला.
     या देशातील तरुण पिढी धर्मापासून विन्मुख नाही; पण त्यांना देशाची संस्कृती शिकवली जात नाही. देशात स्मार्ट सिटीच्या योजना बनत आहेत; पण त्यात कुत्रे असतील, गायी आणि वृक्ष नसतील.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.