आशिष खेतान ही कुणी नावाजलेली प्रसिद्ध व्यक्ती नाही. खेतान हे केवळ संपत्ती आणि सत्ता यांच्या बाजूनेच असतात. आम्ही तर त्यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे अशांना कोण साहाय्य करते, याची चौकशी करायला हवी. त्यांनी ट्विटद्वारे केलेले विधान हे सनातनला अपकीर्त करण्याचे षड्यंत्रच आहे.
दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी ज्या प्रकारे समाजसेवेच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करून पैसा जमवला, त्याचप्रकारे खेतान असे करू पहात आहेत. आम्ही त्यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवू. त्यांनी केलेले घोटाळे आम्ही लवकरात लवकर समाजासमोर आणू.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे आम्ही समर्थन करत नाही; पण त्यांचे अधिकारी शरदकुमार यांनी मालेगाव स्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञासिंह, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी यांना पुष्कळ त्रास दिला. त्यामुळे शरदकुमार यांना अटक करायला हवी. २००८ मध्ये मालेगाव स्फोटाच्या वेळी आतंकवादविरोधी पथकाला इंडिया बूलने विनामूल्य विमाने वापरण्यास दिली. असे असतांना तपास यंत्रणा इंडिया बूलवर का धाडी टाकत नाही ?
Post a Comment