BREAKING NEWS

Thursday, June 2, 2016

आशिष खेतान यांचे विधान म्हणजे सनातनला अपकीर्त करण्याचे षड्यंत्रच ! - अधिवक्ता श्री संजीव पुनाळेकर





आशिष खेतान ही कुणी नावाजलेली प्रसिद्ध व्यक्ती नाही. खेतान हे केवळ संपत्ती आणि सत्ता यांच्या बाजूनेच असतात. आम्ही तर त्यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे अशांना कोण साहाय्य करते, याची चौकशी करायला हवी. त्यांनी ट्विटद्वारे केलेले विधान हे सनातनला अपकीर्त करण्याचे षड्यंत्रच आहे.
       दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी ज्या प्रकारे समाजसेवेच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करून पैसा जमवला, त्याचप्रकारे खेतान असे करू पहात आहेत. आम्ही त्यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवू. त्यांनी केलेले घोटाळे आम्ही लवकरात लवकर समाजासमोर आणू.
       राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे आम्ही समर्थन करत नाही; पण त्यांचे अधिकारी शरदकुमार यांनी मालेगाव स्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञासिंह, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी यांना पुष्कळ त्रास दिला. त्यामुळे शरदकुमार यांना अटक करायला हवी. २००८ मध्ये मालेगाव स्फोटाच्या वेळी आतंकवादविरोधी पथकाला इंडिया बूलने विनामूल्य विमाने वापरण्यास दिली. असे असतांना तपास यंत्रणा इंडिया बूलवर का धाडी टाकत नाही ?

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.