सनातन संस्थेवर बंदी आणणार, या नुसत्या विचारांनी तथाकथित समाजवादी, हिंदूंचा बुद्धीभेद करणार्या विचारवंतांची कीव करावीशी वाटते. सनातन संस्थेेने हिंदू जागा करण्याचे ठरवले, सत्य हिंदूंसमोर आणले, धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगितले. लव्ह जिहाद, मंदिरांत होणार्या चोर्या, धर्मांतर, संत-महंतांचा केला जाणारा छळ यांविषयी सामान्य गृहिणींना समजले, ते केवळ सनातनमुळेच ! सनातनने आम्हाला धर्मावर प्रेम करायला शिकवले. धर्माची विटंबना थांबवून धर्मासाठी जगायला शिकवले.
माझ्यासारखी गृहिणी सनातन प्रभातमधील बातम्या वाचून अस्वस्थ व्हायची. त्यातूनच धर्मकार्य करण्याची अंत:स्फूर्ती निर्माण झाली. अनेक वेळा नातेसंबंधांवर बोलणारी मी तळमळीने धर्माविषयी बोलू लागले. सनातनने व्यक्तींना नव्हे, तर त्यांच्यातील धर्मविरोधी कारवायांना विरोध केला. माणूस निर्माण करणारी संस्था माणसांच्या विरोधात कशी असेल ? संस्थेतील साधकांवर नाहक खोटे-नाटे आरोप करून त्यांना अडकवणे, त्यांची चौकशी करणे, हाच धर्मद्रोह आहे. सनातनमुळे आता आमची तरुण मुले-मुली धर्म समजावून घेऊ लागली आहेत. सनातन संस्थेवर बंदी आणून हिंदूंचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. सनातनवर बंदी आणण्याचे धाडस कोणीही करू नये. अध्यात्माच्या पायावर उभ्या असलेल्या सनातन संस्थेकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये.
Post a Comment