चांदूर रेल्वेः/ शहेजाद खान
सततच्या नापिकी व कर्जापायी ३५ वर्षीय युवा शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना या गावी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. हेंमत भिमराव भेंडे (वय ३५ )रा.राजना असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील तीन वर्षापासुन सतत नापिकीने हेंमत भेंडे त्रस्त होते. यावर्षी कर्ज काढुन त्याने शेतात सोयाबीन पेरले. सततच्या पावसामुळे यंदाही सोयाबीन चाट देईल का याची धास्ती हेंमतने घेतली. अशातच ३ ऑगष्टला पत्नी व आई कामाला गेले व घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने घराच्या छताला गळफास लावुन आत्महत्या केली. त्याच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, चांदूर रेल्वे शाखेचे ४० हजार रूपये कर्ज आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वृध्द आई,१० व ६ वर्षाच्या दोन लहान मुली व दोन लहान भाऊ आहेत. चांदूर रेल्वे पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेवुन पुढील तपास करीत आहे.
Post a Comment