बुलडाणा :-
दयालसिंग चव्हाण/--
संग्रामपुर येथील 8 वी शिकत असलेला
विद्यार्थी पवन सुरेश राजनकार या विद्यार्थ्याचा पांडव नदी येथील पाण्यात बुडुण
मृत्य़ू झाला . दि.30 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घटना घडली आहे. पवन
चे वडील सुरेश राजनकार हे शेतकरी आहेत . 30 जुलै रोजी रविवार असल्याकारणाने पवन हा
मोठा भाऊ व वडील यांना जेवनाचा डबा देण्यासाठी गेला होता . शेताच्या जवळच असलेली पांडव
नदी या नदीत पवन आंघोळ करण्यासाठी गेला. पवन हा 14 वर्षा चा होता व परत न आल्याने
मृतकाचे वडील चौकशीसाठी नदीकाठावर पाहण्यासाठी गेले असता पवन हा त्यांना तरंगता दिसले व त्याला
तात्काळ खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित करण्याची माहिती दिली. मृतक
चे वडील व संग्रामपुर तालुकावासी असे
मागणी करत आहे की रेती तस्करांनी पांडव नदीत मोठमोठे खडडे पाडुन ठेवले आहेत. या खडडयाचा अंदाज पवन याला समजले नाही व
त्यामुळे खडडयात जाऊन घायल झाल्याने पवन याचा मृत्यू झाला. पवनच्या मृत्यूमुळे
संग्रामपुर तालुक्यात अशी खळबळ सुरु असल्याची माहिती दिसुन येत आहे.

Post a Comment