BREAKING NEWS

Thursday, August 4, 2016

धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! - अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

फलटण--

 

 १९७६ या वर्षी कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. या धर्मनिरपेक्ष देशात केवळ हिंदूंवरच अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण करून हिंदूंनी दिलेला पैसा अन्य धर्मियांना दिला जात आहे. हज यात्रेसाठी मुसलमानांना ८२६ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र हिंदूंच्या कुंभमेळ्याला अधिभार लावला जातो. आतंकवादी इशरत जहांला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार बिहारची मुलगी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड बहीण असे संबोधतात. दुसरीकडे सनातनच्या ८०० निरपराध साधकांचा मात्र हत्येच्या खोट्या आरोपांखाली छळ चालू आहे. हिंदु संघटनांवर अकारण बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होत असलेला हा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही, असे प्रातिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर यांनी केले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. सभेच्या आरंभी अधिवक्ता सांगोलकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्रपठणाने सभेचा प्रारंभ करण्यात आला.
        या वेळी हिंगणगाव येथील धर्माभिमानी सौ. साधना शिंदे यांनी रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांचा, तर धर्माभिमानी श्री. उदय पिसाळ यांनी श्री. नीलेश सांगोलकर यांचा सत्कार केला. ५०० धर्माभिमान्यांनी या सभेचा लाभ घेतला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.