चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -
शेतकऱ्यांच्या सोयाबीन , मुंग, हरभरा, तुर आदीं शेतमालाला कवडीमोल भाव बाजारात मिळत आहे. यामुळे शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची तुर ५०५० रूपये प्रतिक्विंटल या भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. व शेतकऱ्यांच्या जवळचा तुरीचा दाना असेपर्यंत हा माल मोजणार असल्याचे जाहीर केले. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची तुर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एक महिन्यापासुन बेवारस पडुन असुनही त्या तुरीचे मोजमाप करून घेण्यास नाफेड अधिकारी टाळाटाळ करीत आहे. या अगोदर मात्र व्यापाऱ्यांनी अतिशय कमी दराने शेतकऱ्यांची तुर खरेदी करून तीच तुर ५ हजार ५० रूपये भावाने नाफेडला देऊन लाखो रूपयांचा मलीदा लाटला. परंतु शेतकऱ्यांनी तीच तुर नाफेड अधिकारी घेत नव्हते हे विशेष.
तरी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा शेवटचा तुरीचा दाना असेपर्यंत खरेदी करणार असे सांगितल्यामुळे खरेदी त्वरीत सुरू करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे तालुका अध्यक्ष रविंद्र किसनरान काळमेघ, रविंद्र मेश्राम, अ. राजीकभाई, शे. सुभान शे. उस्मान, रामदास वरघट, पडोळे, थेटे यांसह शेकडो शेतकऱ्यांनी केली.
लढवय्या माणसाचीही नाही घेतली दखल-
![]() |
| माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोलें |


Post a Comment