http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2272
मुंबई - शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या मंदिरात महिलांना प्रवेश असून तसेच तेथील शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांनी न चढण्याची शेकडो वर्षांची प्राचीन धर्मपरंपरा आहे. २०११ या वर्षापासून देवस्थानच्या विश्वस्तांनी चौथर्यावर चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी स्त्री-पुरुषांना चौथर्यावर चढण्यास बंदी घातली होती. असे असले, तरी प्रतिवर्षी एक दिवस कावड यात्रेच्या गंगाजलाने शनैश्वराला अभिषेक करून यात्रेचा समारोप करण्याची परंपरा तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाप्रमाणे आजची नसून शेकडो वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे ही वर्षातील एक दिवसाची प्राचीन परंपरा चालू ठेवून चौथर्यावर सर्वांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय देवस्थानच्या विश्वस्तांनी घेणे अपेक्षित असतांना भूमाता ब्रिगेडसारख्या नव्या धर्मद्रोही परंपरा निर्माण करू पहाणार्यांच्या भयाने मंदिराची प्राचीन परंपरा मोडण्याचा निर्णय घेणे, हा अत्यंत घाईघाईत घेतला गेलेला दुर्दैवी निर्णय आहे, असे म्हणत हिंदु जनजागृती समितीने या निर्णयाविषयी खेद व्यक्त केला आहे. समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सन्माननीय श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, १. उच्च न्यायालयात या संदर्भातील निकालाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल झालेली असतांना इतक्या घाईने निर्णय घेण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. २. हिंदु मंदिरांच्या धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यास शासन आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे, हे या घटनेतून सिद्ध होते. ३. शासनाने आज कावड यात्रेच्या संदर्भात प्राचीन परंपरांचे रक्षण करणे अपेक्षित होते. त्यासाठी ग्रामस्थ आणि देवस्थान विश्वस्त यांना विश्वासात घेऊन या परंपरेचे रक्षण शासनाने करायला हवे होते. तसेच भूमाता ब्रिगेडसारख्या संघटनांकडून प्रसिद्धीसाठी केल्या जाणार्या आंदोलनांमुळे गावातील कायदा-सुव्यवस्था बिघडत असल्याने भूमाता ब्रिगेडला कायमस्वरूपी गावात प्रवेशबंदी करणे अपेक्षित होते; मात्र या सर्व पातळ्यांवर प्रशासन अपयशी ठरल्याने हे शासन हिंदूंच्या परंपरांचे रक्षण करू शकत नाही, हे या घटनेने दाखवून दिले आहे. ४. जो शनिदेव शनिशिंगणापूर येथे चोरी करणार्याला शिक्षा करतो, त्या शनिदेवाने धर्मबाह्य कृती करणार्यांना सद्बुद्धी द्यावी, ही प्रार्थना !
मुंबई - शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या मंदिरात महिलांना प्रवेश असून तसेच तेथील शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांनी न चढण्याची शेकडो वर्षांची प्राचीन धर्मपरंपरा आहे. २०११ या वर्षापासून देवस्थानच्या विश्वस्तांनी चौथर्यावर चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी स्त्री-पुरुषांना चौथर्यावर चढण्यास बंदी घातली होती. असे असले, तरी प्रतिवर्षी एक दिवस कावड यात्रेच्या गंगाजलाने शनैश्वराला अभिषेक करून यात्रेचा समारोप करण्याची परंपरा तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाप्रमाणे आजची नसून शेकडो वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे ही वर्षातील एक दिवसाची प्राचीन परंपरा चालू ठेवून चौथर्यावर सर्वांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय देवस्थानच्या विश्वस्तांनी घेणे अपेक्षित असतांना भूमाता ब्रिगेडसारख्या नव्या धर्मद्रोही परंपरा निर्माण करू पहाणार्यांच्या भयाने मंदिराची प्राचीन परंपरा मोडण्याचा निर्णय घेणे, हा अत्यंत घाईघाईत घेतला गेलेला दुर्दैवी निर्णय आहे, असे म्हणत हिंदु जनजागृती समितीने या निर्णयाविषयी खेद व्यक्त केला आहे. समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सन्माननीय श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, १. उच्च न्यायालयात या संदर्भातील निकालाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल झालेली असतांना इतक्या घाईने निर्णय घेण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. २. हिंदु मंदिरांच्या धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यास शासन आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे, हे या घटनेतून सिद्ध होते. ३. शासनाने आज कावड यात्रेच्या संदर्भात प्राचीन परंपरांचे रक्षण करणे अपेक्षित होते. त्यासाठी ग्रामस्थ आणि देवस्थान विश्वस्त यांना विश्वासात घेऊन या परंपरेचे रक्षण शासनाने करायला हवे होते. तसेच भूमाता ब्रिगेडसारख्या संघटनांकडून प्रसिद्धीसाठी केल्या जाणार्या आंदोलनांमुळे गावातील कायदा-सुव्यवस्था बिघडत असल्याने भूमाता ब्रिगेडला कायमस्वरूपी गावात प्रवेशबंदी करणे अपेक्षित होते; मात्र या सर्व पातळ्यांवर प्रशासन अपयशी ठरल्याने हे शासन हिंदूंच्या परंपरांचे रक्षण करू शकत नाही, हे या घटनेने दाखवून दिले आहे. ४. जो शनिदेव शनिशिंगणापूर येथे चोरी करणार्याला शिक्षा करतो, त्या शनिदेवाने धर्मबाह्य कृती करणार्यांना सद्बुद्धी द्यावी, ही प्रार्थना !
Post a Comment