BREAKING NEWS

Monday, August 1, 2016

महाराष्ट्र राज्य नास्तिक लोकांच्या संदर्भात सर्वांत पुढे

नवी दिल्ली /--- - २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारताच्या १२० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्येत फक्त ३३ सहस्र जण स्वतःला नास्तिक मानतात, म्हणजेच देशात सध्या केवळ ०.००२७ टक्के जनता नास्तिक आहे. यात ५० टक्के प्रमाण महिलांचे आहे. तसेच गावातील लोक शहराच्या लोकांच्या तुलनेत धर्म सोडून नास्तिक बनण्यात पुढे आहेत. त्यातही महाराष्ट्र राज्य नास्तिक लोकांच्या संदर्भात सर्वांत पुढे आहे. येथे ९ सहस्र ६५२ लोकांनी स्वतःला नास्तिक घोषित केले आहे. दुसरीकडे बंगालसारख्या देव न मानणार्‍या बहुसंख्य साम्यवाद्यांच्या राज्यात केवळ ७८४ जणांनी स्वतःला नास्तिक म्हटले आहे.
     जगातील एकूण नास्तिक लोकांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागत असल्याचा दावा प्यू रिसर्च सेंटरने केला होता. अहवालात भारतात नास्तिकांची संख्या ७ लाखांपेक्षाही अधिक म्हटली गेली होती; मात्र जनगणनेच्या आकडेवारीनुसार ती खरी नसल्याचे दिसून आले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.