BREAKING NEWS

Monday, August 1, 2016

सनातन संस्थेकडून राबवल्या जाणार्‍या उपक्रमांमुळेच चारित्र्यसंपन्न पिढी सिद्ध होऊन समृद्ध समाज प्रस्थापित होईल ! - सचिन इनामदार

बेळगाव -




ऋषिमुनी, तसेच संत यांनी सांगितलेल्या शास्त्राप्रमाणेच सनातन संस्थाही समाजप्रबोधन करत आहेत. समाजातील अध्यात्म आणि धर्म यांविषयीचे चुकीचे समज दूर होऊन समाज नीतीवान होण्यासाठी सनातनकडून अनेक उपक्रम राबवले जातात. याच माध्यमांतून चारित्र्यसंपन्न पिढी सिद्ध होऊन समृद्ध समाज प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन श्री. सचिन इनामदार यांनी केले. येथील रामनाथ मंगल कार्यालयात हिंदुत्ववादी आणि राष्ट्र्रप्रेमी मित्र परिवाराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या होणार्‍या मागणीला विरोध करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
      श्री. इनामदार पुढे म्हणाले, आमचा हा मित्र परिवार कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, तसेच कोणत्याही संघटनेचेही आम्ही सभासद नाही; परंतु आम्ही हिंदु धर्माशी निगडीत सकारात्मक विचारविमर्श करून हिंदु धर्म आणि समाज यांच्या समृद्धीसाठी कार्य करत असतो. सनातन संस्थाही गेली अनेक वर्षे हेच कार्य करत आहे.
      या पत्रकार परिषदेला धर्मप्रेमी सर्वश्री भालचंद्र जाधव, व्यंकटेश शिंदे, पृथ्वीराज काकतकर उपस्थित होते, तसेच हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने सनातनला पाठिंबा दर्शवण्यासाठी ३० हिंदुत्वनिष्ठही उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.