मुंबई–
मुसलमान मौलवींकडून जारी केले जाणारे फतवे ही आपल्या देशात एक डोकेदुखीच होऊन बसली आहे. कुणीही मुल्ला उठतो आणि कुराण आणि शरीयतचा आधार घेऊन वाट्टेल तो फतवा काढतो. असे बेलगाम फतवे जारी करणार्यांवर कुणाचेच नियंत्रण उरलेले नाही. फतवे घोषित करणारे मौलवी समाजद्रोही आणि धर्मद्रोहीच आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या अग्रलेखातून केले. काही दिवसांपूर्वी ‘नाहीद आफरीन या १० वीत शिकणार्या मुलीने सार्वजनिक ठिकाणी गाऊ नये’, असा फतवा काढण्यात येऊन त्यावर ४६ मौलवींनी स्वाक्षर्या केल्या होत्या. या घटनेविषयी १६ मार्च या दिवशीच्या दैनिक सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला होता.
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,
१. मुसलमान समाजाची दुर्दशा, निरक्षरता यांविरुद्ध कधी मौलवींनी फतवे जारी केल्याचे ऐकिवात नाही. आतंकवादी कारवायांपासून दूर रहा, असा शहाणपणाचा समादेश देणारा फतवाही कधी जारी होत नाही.
२. फतव्यावर स्वाक्षर्या करणार्या ४६ मौलवींपैकी मूळ आसामी किंवा हिंदुस्थानी मौलवी किती आहेत आणि बांगलादेशी मौलवी किती हेदेखील पहायला हवे.
३. कायद्याच्या राज्यात आणि लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारे फतवे जारी करणे, हेच मुळात अवैध आहे. मुसलमान समाजात एक प्रकारे समांतर न्यायव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी या फतव्यांचा वापर होत आला आहे. अशी तालिबानी फर्माने सोडणार्या मौलवींना पकडून त्यांना कठोर शासन केल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत.
४. नाहीद आफरीनसारखी नवोदित गायिका किंवा महिलांवरच तालिबानी फतव्यांच्या कुर्हाडी कोसळत असतात. असे फतवे काढणार्या मौलवींच्या मुसक्या आवळून त्यांना एकदा हिंदुस्थानची राज्यघटना शिकवावीच लागेल.
Post a Comment