यासाठी अवमान याचिका का प्रविष्ट करावी लागते ? न्यायालयाच्या आदेशाचे पालन का केले जात नाही ?
ठाण्यातील मशिदीवरील भोंग्याचे प्रकरण
ठाणे – येथील मो.ह. विद्यालयाशेजारच्या मशिदीवरील भोंगे विद्यार्थांच्या अध्ययनात अडथळे ठरत असून ते बंद करावेत, या मागणीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे डॉ. महेश बेडेकर यांनी पोलीस आणि राज्य सरकार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली. (न्यायालयाच्या निर्णयावर कार्यवाही होत नसल्याने अवमान याचिका प्रविष्ट करावी लागणे ही शोकांतिकाच ! – संपादक) इतर ठिकाणाहूनही अशा प्रकारच्या अवमान याचिका आल्याने एकत्रित सुनावणी होणार असल्याचे याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. याचिका प्रविष्ट केल्यानंतर सध्यातरी परिसरातील मशिदीवरील भोंगे वाजत नसल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यालयाजवळील मशिदीवरील भोंगे मुसलमानांच्या प्रार्थनांच्या वेळांमध्ये चालू असायचे. त्यामुळे अध्ययनात व्यत्यय येत असे. शांतताक्षेत्रातही असे घडत असल्याने जागरूक नागरिकांनी याविषयी तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही
साभार - दैनिक सनातन प्रभात
Post a Comment