पुरीचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची हिंदुत्वाची उपेक्षा करणार्या राजकीय पक्षांना चेतावणी

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती
वृंदावन (उत्तरप्रदेश) – राजकीय पक्षांनी हिंदुत्वाची उपेक्षा करणे थांबवले नाही, तर एक दिवस संतसमाज संघटित होऊन त्यांचे अस्तित्वच नष्ट करेल, अशी चेतावणी पुरीचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी दिली.
येथील हरिहर आश्रमात बोलतांना शंकराचार्य म्हणाले,
१. भाजपसह कोणताही राजकीय पक्ष हिंदूंचा समर्थक नाही. भाजप अन्य पक्षांप्रमाणे उघडपणे हिंदूविरोधी नसेल; पण हिंदूंचा
समर्थकही नाही.
२. भाजपला हिंदुत्वाचा समर्थक समजणार्यांना स्वामीजी म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘विकासा’च्या सूत्रावर सत्तेत आले आहेत, हिंदुत्वाच्या सूत्रावर नाही.’ त्यामुळे ते हिंदुहिताचा निर्णय घेण्याची शक्यता नाही.’’
३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावात येऊन भाजपचे नेते प्रत्येक वेळी हिंदूंना मोहित करणारे राममंदिर, गोवंश रक्षण आणि गंगा नदीचे पावित्र्य अशा गोष्टींमध्ये रस दाखवतात; परंतु सत्ता मिळाल्यावर विशेषत: राममंदिराचे सूत्र सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष करतात.
४. भाजपकडून निराश झाल्यानंतर साधूसंतांना आता प्राचीन ऋषि-मुनींची भूमिका पार पाडावी लागेल आणि हिंदुहिताचे रक्षण करणार्या पक्षाकडे देशाची सत्ता सोपवण्यासाठी जनतेला सिद्ध करावे लागेल.
५. संत एक वेळा संघटित झाले, तर हे अशक्य नाही. शंकराचार्य आणि आचार्य चाणक्य यांसारख्या विभूतींनी असे कार्य करून दाखवले आहे.
६. भारतात रहाणार्या सर्वधर्मीय लोकांचे हित हिंदुत्वाला प्रोत्साहन मिळाल्यानेच साधले जाऊ शकते; कारण सनातन हिंदु धर्म ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या सिद्धांतावर आधारित आहे. या धर्मात अन्य धर्मियांशी भेदभाव होणे शक्य नाही.
Post a Comment