Sunday, April 23, 2017
हिंदु राष्ट्रासाठी आईच्या गर्भातून ‘मी हिंदु आहे’, असे म्हणण्याची आवश्यकता ! – राहुल कोठारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
Posted by vidarbha on 8:21:00 AM in | Comments : 0
काँग्रेस आणि डावे यांनी फार पूर्वीपासून प्रसारमाध्यमांना त्यांच्या कह्यात ठेवून सातत्याने गरळओक करत आले आणि ‘हिंदुत्व हा एक धोकादायक विचार आहे’, असे सांगत आले. सुदैवाने आज ह्या गोष्टींना जनतेने नाकारले असून अखंड भारतासाठी पाऊल उचललेले आहे, ज्याचा परिणाम लोकसभा आणि उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पहायला मिळाला आहे. अशा प्रकारच्या राष्ट्रविरोधी तत्त्वाचा अपप्रचार हाच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील मुख्य अडचण आहे. भारताची जनताच याला एकता आणि अखंडता यांच्या माध्यमातून या अपप्रचाराला उत्तर देणार आहे. आम्ही जेव्हा ‘लोककल्याणातून रामराज्य स्थापन करण्याची गोष्ट करतो, तेव्हा आम्हाला विरोध चालू होतो. आम्ही म्हणतो की, ‘वन्दे मातरम्’ म्हटले पाहिजे, तर विरोध चालू होतो. आम्ही म्हणतो की, विदेशातून येणारे आर्थिक साहाय्य बंद व्हायला पाहिजे, तर आम्हाला विरोध होतो. जेवढे दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम देशद्रोही आहेत, तेवढेच राष्ट्रविचारांना सातत्याने विरोध करणारे मार्कण्डेय काटजू आणि सच्चर हेही देशद्रोही आहेत. जर आम्हाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारताला हिंदु राष्ट्र करायचे आहे, तर आम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल. आम्ही म्हणतो की, ‘गर्व से कहो हम हिन्दू है’; परंतु आज लहान मुलानेही त्याच्या आईच्या गर्भातून अभिमानाने ‘मी हिंदु आहे’, असे म्हणण्याची आवश्यकता आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment