BREAKING NEWS

Thursday, December 8, 2016

क्रीड़ास्पर्धेमुळे लढण्याचे बळ मिळते - श्री निलेश विश्वकर्मा



चांदुर रेल्वे :-  ( शहेजाद खान ) - 

 युवा अवस्थेत  प्रत्येक क्रीड़ा स्पर्धेत युवकांनी भाग घेतला पाहिजे. कारण या स्पर्धांमुळे जीवनातील प्रत्येक स्पर्धेत लढण्याचे बळ मिळते असे मत युवा नेते निलेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले. ते छत्रपति शाहु क्रीड़ा मंडळ, जावरा यांच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने बोलत होते.
   ते पुढे बोलतांना म्हणाले की, जीवनात अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो मग तो नोकरी साठी असो की राजकारण.  क्रीड़ा स्पर्धेत भाग घेतल्यास संघर्षच्या सर्व बाबींची ओळख होते व आपण त्यात यश मिळवितो. परंतु प्रत्येक वेळी यशच मिळेल अस नाही तर मोठ्या मनाने हार पत्कारने हे ही क्रीड़ा स्पर्धाच आपल्याला शिकविते असे मतही निलेश विश्वकर्मा यांनी यावेळी व्यक्त केले.
   या वेळी मंचकावर माजी आमदार अरुण अडसड, धामणगाँव चे नवनियुक्त नगराध्यक्ष प्रताप अडसड आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन व यशस्वीतेसाठी मंडळाचे राहुल वरघट, किरण ठाकरे सचिन रामचौरे,सचिन जीभकाटे, उदय ठाकरे, निखिल अम्बरते, मंगेश गाढ़वे, गजानन बोरकर, प्रेम स्वर्गे आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.