* प्रविण गोंगल / चंद्रपूर /* --
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही गरिबांसाठी असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्यात यावा. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करा असे आवाहन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ग्राम उदय से भारत उदय अभियान तथा राजीव गांधी जीवनदायी योजने अंतर्गत ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. चंदनसिंग चंदेल, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, हरीश शर्मा, डॉ. एस.एल.दुधे, डॉ. हरदास, अमोल वाघमारे, सुनील भगत व तहसीलदार अहिरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांचे हस्ते आरोग्य शिबीर व टोकन पध्दतीचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय सेवा देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य नेहमी उत्तम राहावे. कोणालाही रुग्णालयात येण्याची गरज भासू नये. सर्वात जास्त निधी आरोग्य सेवेला देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. या अगोदर आपण हया क्षेत्रात अनेक शिबीरे घेऊन नागरिकांना रुग्ण सेवेचा लाभ दिला आहे. बल्लारपूरचे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडले गेल्यामुळे भविष्यात या ठिकाणी उत्तम सेवा मिळतील असा विस्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी 835 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगून ते म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी योजनेला अधिक गती देण्याची गरज आहे. शिबिराचे प्रास्ताविक डॉ. दुधे यांनी केले. दुपारपर्यंत 384 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरास मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही गरिबांसाठी असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना देण्यात यावा. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करा असे आवाहन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ग्राम उदय से भारत उदय अभियान तथा राजीव गांधी जीवनदायी योजने अंतर्गत ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. चंदनसिंग चंदेल, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, हरीश शर्मा, डॉ. एस.एल.दुधे, डॉ. हरदास, अमोल वाघमारे, सुनील भगत व तहसीलदार अहिरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांचे हस्ते आरोग्य शिबीर व टोकन पध्दतीचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय सेवा देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य नेहमी उत्तम राहावे. कोणालाही रुग्णालयात येण्याची गरज भासू नये. सर्वात जास्त निधी आरोग्य सेवेला देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. या अगोदर आपण हया क्षेत्रात अनेक शिबीरे घेऊन नागरिकांना रुग्ण सेवेचा लाभ दिला आहे. बल्लारपूरचे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडले गेल्यामुळे भविष्यात या ठिकाणी उत्तम सेवा मिळतील असा विस्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी 835 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगून ते म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी योजनेला अधिक गती देण्याची गरज आहे. शिबिराचे प्रास्ताविक डॉ. दुधे यांनी केले. दुपारपर्यंत 384 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरास मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते
Post a Comment