चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---
चांदूर रेल्वे ची नगर परिषद कुठल्या ना कुठल्या प्रकरणात संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असतेच , न.प मधला घरकुल घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला असे असतानाही स्थानिक न.प मधील मुख्याधिकारी ठाकरे व नगराध्यक्ष यांचा पुन्हा एक मनमानी कारभार पुढे आला आहे दरवर्षी शहरातील 40 ते 45 कामांचा होणार्या निविदा ठरावानंतर २०१६ -१७ च्या निविदा प्रसिद्ध न करता थेट जुन्याच ठेकेदारांना वाढीव मुदत दिली असून यामुळे न.प ला लाखोंचा फटका बसणार असल्याची तक्रार शिक्षण सभापती श्री नितीन गवळींनि जिल्हाधिकारी श्री किरण गित्ते यांचा कडे केली असून मुख्याधिकारी व नगराध्यक्षवर कारवीची मागणी केली आहे , सविस्तर वृत्त असे कि शहरातील नळी उपसणे , काचा कुंडी साफ करणे , स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे , पाण्याचा जागी ब्लिचिंग टाकणे , जेसीबी ने मोठ्या नाल्यांची सफाई अश्या ४५ चा जवळपास कामांची निविदा दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येते सन २०१६ ते २०१७ या वर्षाची निविदा प्रसिद्ध होऊन १ एप्रिल पर्यंत प्रसिद्ध व्हायला पाहिजे होती या करिता ९ मार्च चा विशेष सभेत वार्षिक निविदा प्रसिद्धकरण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला या ठरवावर ७७ (१)(ब) अंतर्गत मुख्याधिकारी ठाकरे यांना अंमलबजावणी करणे गरजेचे होते तसेच या ठरावावर अंमलबजावणी करवून घेण्याची जवाबदारी नगराध्यक्ष यांची होती असे न केल्यास कलम ५५ (अ) नुसार त्यांचावारही निलंबनाची कारवाई होऊ शकते असे असताना सुधा मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी मनमानी कारभार करीत नवीन निविदा प्रसिद्ध न करता जुन्याच ठेकेदारांना कामांची बेकायदेशीरपणे वाढीव मुदत दिली त्यामुळे नगरपरिषद ला लाखोंचा फटका बसणार आहे
आधीच संपूर्ण महाराष्ट्र सहित जिल्ह्यात न.प मधील अनेक घोटाळे गाजत असताना मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी कर्तव्यात कसूर केला. नगराध्यक्ष असक्षम ठरले तर त्यांनी न.प १९६५ अधिनियमाचे उल्लंघन केले आहे त्यामुळे दोषी मुख्याधिकारी , नगराध्यक्ष यांचावर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण सभापती श्री नितीन गवळीं यांनी जिल्हाधिकारी ना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
<> <>श्री नितीन गवळी (शिक्षण सभापती ) <><>
प्रभाग क्रमांक 4 ची पोटनिवडणूक नुकतीच संपन्न झाली हीच निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन नगराध्यक्षांनी जुन्याच ठेकेदारांना वाढीव मुदत दिली व आचार संहितेचा भंग केला कारण प्रभाग 4 मध्ये जास्त ठेकेदार आहेत व याच ठेकेदारांना याचा लाभ व्हावा या हेतूने हा निर्णय घेतला गेला.
<><> मुख्याधिकारी यांचा गलथान कारभार <><>
नवीन रुजू झालेल्या मुख्याधिकारी यांचा गलथान कारभार असल्याचे चित्र दिसत आहे शहरातील अनेक समस्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे , घरकुल घोटाळ्यातील दोषींवर त्यांचा कारवाई प्रक्रियेवर अनेकांना संशय आला असताना आता पुन्हा जुन्याच ठेकेदारांना दिलेल्या वाढीव मुदतीवर प्रश्न निर्माण झाला आहे.
Post a Comment