१. भिडे पूल येथे समितीचे कार्यकर्ते प्रबोधनात्मक फलक हातात धरून, तसेच उद्घोषणा करून भाविकांना धर्मशास्त्र सांगून गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन करत होते. या वेळी घाटावरील महिला पोलिसाने समितीच्या कार्यकर्त्यांना उद्घोषणा करणे थांबवण्याविषयी सांगितले. नागरिक तिकडेच (नदीकडे) जातील. तिथे गर्दी वाढेल, असे कारण सांगत महिला पोलिसाने समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. २. पोलीस अधिकार्यांनी मोहीम बंद पाडण्यापूर्वी वस्तुस्थिती काय आहे, याचा विचार करायला हवा होता. कदाचित समितीच्या प्रबोधनामुळे नदीत विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल वाढल्यानेच मोहीम बंद करण्यास सांगितली असावी, असे भिडे पूल येथे मोहीम राबवणार्या समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
४. एस्.एम्.जोशी पुलाजवळील घाटावरही पोलिसांनी अशा प्रकारे मोहिमेस विरोध केला. त्यासाठी प्रारंभी पोलिसांनी मोहिमेसाठीच्या अनुमतीपत्राची मागणी केली. ते दाखवल्यानंतर आम्ही अनुमती कधीही रहित करू शकतो, असे सांगत पोलिसांनी कार्यकर्त्यांना दटावले.
५. कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास सांगणार्या कमिन्स संघटनेच्या कर्मचार्यांनाही पोलिसांनी निघून जाण्यास सांगितले.
६. वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन होऊ लागल्यास पोलिसांचे सतर्क रहाण्याचे दायित्व अधिक वाढेल म्हणूनच अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने समितीची सनदशीर मार्गाने चालणारी मोहीम बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले. पोलिसांची ही कृती निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केली.
Post a Comment