शिवसेनेचे श्री. महेश मिस्त्री म्हणाले, "अन्य धर्मियांच्या सणांच्या
वेळी अशी अनुमती कधीच मागावी लागत नाही. मग केवळ हिंदूंच्याच सणांच्या
संदर्भात अशी बंधने का ? भारनियमनही केवळ हिंदूंच्याच सणांच्या कालावधीत
केले जाते; पण अन्य वेळी का नाही ? बकरी ईदच्या नंतरही २० दिवस दुर्गंध येत
असतो. प्रत्येक वेळी हिंदूंनीच का हे सहन करायचे ? शासन जरी आमचे असले,
तरी अन्याय मात्र हिंदूंवर होणे, हे खेदजनक आहे. हिंदूंच्या सणांवरील
निर्बंध काढले पाहिजेत."
भाजपचे श्री. हिरामणअप्पा म्हणाले,"क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवण्यास
प्रशासनाने सांगितले आहे; मात्र मंडळाला ते बसवणे शक्य नाही. प्रशासनानेच
ते बसवावेत."
बैठकीतील अन्य अनुभव
१. हिंदु आणि मुसलमान धर्म यांची समानता विशद करणारे हिंदूंचे घोर अज्ञान !
एका तथाकथित हिंदुत्वनिष्ठाने हिंदु आणि मुसलमान धर्म कसे समान आहेत,
याविषयी सांगितले. ते म्हणाले, "शिवाने त्याचा मुलाचा शिरच्छेद केला. नंतर
त्याला हत्तीचे डोके बसवण्यात आले, तसेच पैगंबरच्या मुलाचे मुंडके बकरीचे
झाले. त्याचा बळी दिला; म्हणून श्री गणेशचतुर्थी आणि बकरी ईद समवेत
येतात."
Post a Comment