पुणे-
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर आणि श्याम मानव यांच्याशी श्रद्धा अन् अंधश्रद्धा यांविषयी अनेक वेळा चर्चा करूनही कोणताही लाभ नाही; परंतु ते लोक ऐकणारे नाहीत. ते धर्माची हानी करतात. त्यामुळे अंनिसवर बंदी घालायला हवी, असे मत आळंदी येथील ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि अन्य कार्यकर्ते यांनी ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांची त्यांच्या आश्रमात भेट घेतली. या वेळी त्यांना श्रीक्षेत्र आळंदी येथे २६ नोव्हेंबर या दिवशी होणार्या १२ व्या वारकरी महाअधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
ह.भ.प. किसनमहाराज साखरे पुढे म्हणाले, धर्मावर आघात होत असतांना आपण शांत राहून चालणार नाही. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आज प्रत्येकाला आवश्यकता आहे. तुमच्या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत.
Post a Comment