![]() |
श्री. रमेश शिंदे |
श्री. शिंदे पुढे म्हणाले, ‘‘आज हिंदूंसमोर अनेक संकटे आहेत; पण प्रत्येक हिंदू विचार करतो, ‘मी एकटा काय करू ?’ हिंदूंनी असा विचार न करता प्रभु श्रीरामाने ज्याप्रमाणे रावणवध करण्यासाठी अयोध्येचे सैन्य न मागवता म्हणजेच राजाश्रयाचा विचार न करता वनवासात स्वतःची सेना उभारली, त्याप्रमाणेच धर्मावर प्रेम करणार्यांना संघटित करायला हवे. तमिळनाडू राज्यातील डीएम्के पक्षाचे अध्यक्ष करुणानिधी यांनी श्रीरामाची विटंबना करून श्रीरामसेतू तोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात रामसेतू तसाच राहिला असून आज त्यांच्या परिवारातच फूट पडली आहे, सख्खे भाऊ एक-दुसर्याच्या विरोधात उभे राहिले आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या रामनामाने पाण्यात दगड तरले, त्या रामाचे नाव घेतल्यावर तो आपला उद्धार निश्चित होईल, अशी श्रद्धा बाळगून हिंदूंनी उपासनेचे बळ प्राप्त केले पाहिजे.
क्षणचित्रे
१. उज्जैन येथील श्री. भूपेंद्र गुलाटी आणि श्री. संजीव पांचाळ यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले.
२. कार्यक्रमाच्या पूर्वी ‘पुरुषोत्तम सागर’ या उज्जैन येथील सप्त सागरांपैकी एक असलेल्या ऐतिहासिक तलावाच्या काठी सामूहिक आरती करण्यात आली.
Post a Comment