BREAKING NEWS

Friday, December 9, 2016

हिंदूंनी शिवनीती आणि शिवप्रताप २४ घंटे आपल्या हृदयात जागृत ठेवायला हवा ! - अधिवक्ता तुकारामराव चिंचणीकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

कोपरखैरणे (नवी मुंबई) 



  अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांच्या सामर्थ्याची कीर्ती देशभर पसरली होती. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर चाल करून येण्याचे औरंगजेबाचे कधीही धाडस झाले नाही. हिंदूंनीसुद्धा असा धाक निर्माण करणे आवश्यक आहे. याकरिता शिवनीती आणि शिवप्रताप २४ घंटे आपल्या हृदयात जागृत ठेवायला हवा, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे व्याख्याते अधिवक्ता तुकारामराव चिंचणीकर यांनी केले. येथील शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी १०० हून अधिक शिवप्रेमी उपस्थित होते. स्वप्नील यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 
     ते पुढे म्हणाले, ‘‘अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला असला, तरी आजही अफझलप्रवृत्ती सर्वत्र जिवंत आहेत. काश्मीर येथून साडेचार लक्ष काश्मिरी पंडितांना हाकलून लावणारे, याकूब मेनन आणि काश्मीर येथील बुरहान वाणी या आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होणारे लोक या अफझल प्रवृत्तीचे आहेत. त्यांना शिवाजी महाराजांच्या नीतीनेच शिक्षा होणे आवश्यक आहे.’’ 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.