BREAKING NEWS

Monday, January 9, 2017

तरुण पिढीला क्रांतीकारकांच्या पराक्रमाची ओळख होणे आवश्यक – सौ. सुनीता दीक्षित, हिंदु जनजागृती समिती

माळशिरस (जिल्हा सोलापूर)–

 छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्यांच्या छाताडावर पाय ठेवून या भूमीला हिंदवी स्वराज्य म्हणून घोषित केले. पुढे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधू, भगतसिंग, राजगुरु यांसारख्या अनेक क्रांतीकारकांच्या बलीदानामुळे भारतभूमी इंग्रजांच्या दास्यत्वातून मुक्त झाली, अशा पराक्रमी क्रांतीकारकांचे धडे इतिहासातून वगळले जात आहेत. त्यांच्या पराक्रमाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठीच निमगांव येथे ३० डिसेंबर या दिवशी येथील निमगाव विद्यामंदिर येथे फ्लेक्स प्रदर्शन भरवण्यात आले होते. या वेळी सौ. सुनीता दीक्षित बोलत होत्या. त्यांनी या प्रदर्शनाविषयी माहिती देऊन ३१ डिसेंबर साजरा करू नये, याविषयी प्रबोधन केले. या प्रदर्शनाचा ६०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. फलकावरील प्रबोधनात्मक लिखाण मुलांनी लिहून घेतले. शिक्षकांनाही प्रदर्शन आवडले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.