BREAKING NEWS

Sunday, February 5, 2017

भांडलवशाही, इलेक्ट्रानिक्य माध्यमे,व्यवस्था शेतकऱ्यांना लंबे करीत आहे -प्रा.डॉ.श्री सदानंद देशमुख

विदर्भ स्तरिय ५ वे शब्दगंध साहित्य सम्मेलनाचे थाटात उद्घाटन


चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-

-


भांडवलशाहीना शेतकऱ्यांच्या जमीनी पाहिजे आहे. तसे शेतकरी त्यांच्या जमिनी देणार नाही म्हणून त्यांच्या शेतमालाला भावच दिल्या जात नाही. त्यांची शेती तोट्यात जाईल असेच राजकारण सुरू आहे. माणसं आशेने निवडून देतात हे सरकारं काही भलं करेल. परंतु त्यांची तर त्यापेक्षाही वाईट स्थिती आहे. हे सर्व स्वातंत्र्यापासुन सुरू आहे. आज भांडवलशाही, इलेक्टानिक्स माध्यमे व व्यवस्थाशेतकऱ्यांना लंबे करीत आहे असे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यीक प्रा.डॉ.सदानंद देशमुख यांनी केले.


ते चांदूर रेल्वे येथील कर्मयोगी गाडगेबाबा साहित्य नगरी जि.प.हायस्कूल  व कनिष्ठ महाविद्यालय,चांदूर रेल्वे येथे आयोजित पाचवे विदर्भ स्तरिय शब्दगंध सम्मेलनाचे सम्मेलनाध्यक्ष म्हणून अध्यक्षीय भाषण करतांना बोलत होते.


कार्यक्रमाचे उद्घाटक शिवाजी महाविद्यालय, अमरावतीचे मास कम्युनिकेशनचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.कुमार बोबडे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा.वीरेंद्र जगताप, यवतमाळ आकाशवाणीचे उद्घोषक प्रमोद बाविसकर, उद्घोषक मंगलाताई माळवे, कार्यक्रम अधिकारी जयंत शेटे व स्वागताध्यक्ष चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष शिट्टू उर्फ  निलेश सुर्यवंशी व शब्दगंध परिषदचे अध्यक्ष कृष्णकुमार  पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी शब्दगंध साहित्य आणि सांस्कृतिक परिषदचे दिवगंत माजी अध्यक्ष हरगोविंद वानरे, मनोहर बावीसकर व सदस्य योगी नाईक यांना सामुहिक मौन श्रध्दाजंली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.डॉ.कुमार बोबडे यांनी आजची प्रसार माध्यमे भांडवलदारांनी विकत घेतली आहे. आता 4 G चा जमाना आला असुन राजकारणही ‘ जी ‘मय झाले आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या व्यथा व वेदनेशी काही घेणं देणं नाही असे डॉ.बोबडे यांनी सांगीतले. आ.प्रा.वीरेंद्र जगताप यांनी साहित्यातुन समाजातील खरे व्यथा व दुःख मांडल्या गेले झाले पाहीजे असे सांगीतले. तर प्रमोद बाविसकर यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास, एकनाथ यासह अनेक संतांनी ओवी, अभंग, भारूड यातुन दहा लाखांच्यावर काव्याची निर्मिती करून ते लोकांपर्यंत पोहचविल्याचे सांगीतले. स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी यांनी आपले विचार मांडले.यावेळी सम्मेलन अध्यक्ष प्रा.डॉ.सदानंद देशमुख, आ.प्रा.वीरेंद्र जगताप, प्रा.डॉ.कुमार बोबडे, प्रमोद बाविसकर,मंगला
माळवे,जयंत शेटे यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रा.डॉ.प्रशांत ठाकरे यांचे ‘आर.के.नारायण अ‍ॅन अ‍ॅडीटीफाईड पर्सन‘ या पुस्तकाचे तर प्रा.सोनु पिंजरकर यांच्या ‘ जीवन फुलोर ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध साहित्य व सांस्कृतिक परिषदचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी केले. तर संचालन प्रा.प्रसेनजित तेलंग व आभार प्रा.रवींद्र मेंढे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध साहित्य आणि सांस्कृतिक परिषदचे कृष्णकुमार पाटील, प्रा.डॉ.प्रशांत ठाकरे, नानासाहेब डोंगरे, प्रा.रवींद्र मेंढे, खुशाल गुल्हाने, प्रमोद भागवत, अ‍ॅड.राजीव अंबापुरे, संजय चौधरी,प्राचार्य विश्वास दामले, प्रा.प्रसेनजित तेलंग, दीपक सोळंके, अमोल गवळी, विवेक राऊत, प्रा.निशा जोशी, कविता कटकतलवारे, गोकुल राय, प्रतापसिंह खंडार, उज्ज्वल पंडेकर, भूषण नाचवणकर, अजय वाघ, प्रा.राहूल तायडे, धीरज जवळकर, दीपिका वाजपेयी, अमोल म्हसतकर, अनुश्री चौधरी, शिवश्री चौधरी, अनिल वाडेकर यांनी परिश्रम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.