यावेळी व्यासपीठावर महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तापक्ष नेते संदिप जोशी, विश्वराज कंपनीचे अरुण लाखाणी, फिलीप्सचे हर्ष चितळे, सिस्कोचे अनिल नायर तसेच व्ही. के. गौतम यांची उपस्थिती होती.
महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या की, शहराची लोकसंख्या अधिक असून व्यवस्थित नियोजनाव्दारे शहराची विकास प्रक्रिया होत आहे. चोविस तास पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. तसेच रस्त्यांची कामे, मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असून शहराला स्मार्ट व सस्टेनेबल सिटी बनविण्यात येत आहे. याकरीताच स्मार्ट आणि सिटी प्रकल्पाचा उद्देश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्मार्ट शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रीमती जिचकार यांनी यावेळी सांगीतले.
स्मार्ट सिटी शिखर संमेलनाच्या माध्यमातून विविध शहरातील व विदेशातील प्रतिनिधीमार्फत स्मार्ट सिटी संदर्भात नविन माहिती घेणे तसेच संशोधन , नविन ज्ञान व तंत्रज्ञान याबाबत चर्चा होवून माहिती मिळणार आहे. तसेच विचारांची देवाण-घेवाण होऊन त्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी केले.
यावेळी विविध देशातील शहरातील महापौर,आयुक्त, उपायुक्त, नगराध्यक्ष तसेच विदेशातील प्रतिनिधी उपस्थित होते.
Post a Comment