कर्जत/जयेश जाधव/ :----
पत्रकार उत्कर्ष समिति व ओम साई आनंद प्रतिष्टान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्री रंगवा या आगल्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये लहानांपासुन मोठ्यांनीही आवडीने सहभाग घेतला होता या वेळी फक्त चिञकेलेचाच विषय न घेतां त्या मधुन सामाजिक प्रबोधन कसे घडेल या कडेही प्रामुख्याने लक्ष दिले होते छत्र्यांवरचिञकलेचे विषयशेतकयांच्याआत्महत्यापाणीवाचवा लेक वाचवा, निसर्ग वाचवा यासारखे सामाजिक विषय दिले गेले होते. त्यानंतर त्या छत्र्या गरीब गरजु व अनाथ बालकांना वाटप करण्यात आल्या यावेळी परिसरातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास परिक्षक म्हणून महाराष्ट्रातील नामवंत चित्रकार व रांगोळीकार लाभले त्यावेळेस प्रमुख अथितीच्या हस्ते स्पर्थकांना सन्मानचिन्ह व गौरवपञ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डाॅ. शांताराम कारंडे व साै़ संध्या दोशी नगरसेविका यांच्या सह पत्रकार उत्कर्ष समितिचे संस्थापक अध्यक्ष डाॅ अशोक म्हात्रे , अध्यक्ष मिडीया सेल सौ, रुचिता मलबारी . सचिव डाॅ वैभव पाटिल , सहसचिव अमोल सांगळे व अध्यक्ष एज्युकेशन सेल डी जी पाटिल तसेच कार्यक्रमाचे आयोजक राजेश हेडाऊ डाॅ आनंद हेडाऊ , अंकिता हेडाऊ व त्यांचे सहकारी यांच्या अथक परीश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
Post a Comment