चांदूर रेल्वे : (शहेजाद खान)-
एकीकडे शेकडो बैलजोड्या असण्यार्या व तालुक्यात सुपिक जमिनीसाठी प्रसिद्ध असणार्या तालुक्यातील सावंगा बुजरूग या गावात शेकडो शेतकरी सुद्धा होते. परंतु बेंबळा प्रकल्पाच्या भकास धोरणामुळे हे गाव पार लयास गेल्याचे चित्र ह्या पोळय़ावरून दिसत आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यात एकेकाळी सुपिक जमिनीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावंगा बुजरूग या गावात शंभर ते दोनशे शेतकरी तर दोन-तिनशे बैलजोड्या होत्या व ह्या गावात पोळय़ाच्या मानासाठी व अस्तित्वासाठी दोन गटात नेहमी वादंग व्हायचे. याच सावंबा बु. गावाला बेंबळा प्रकल्पाने पूर्णत: खिळखिळे केले अाहे. ह्या गावात शंभर-शंभर एकर शेती, दोन-दोन तीन-तीन बैलजोड्या, शेकडो गाई असायच्या. या गावाचा बेंबळा प्रकल्पात समावेश झाल्याने येथे आता सुरेशराव सोळंके, मनोज कडू, संतोष सोळंके, बंडू मेटकर, सुनिल सोळंके, रामदासजी सोळंके, रमेश देवपारे, नानाजी तायवाडे एवढे बोटावर मोजण्याएवढे शेतकरी राहिले असून त्यांच्याकडे नव्याने घेतलेली जमीन सुध्दा खूपच अल्प प्रमाणात आहे. इतर शेतकर्यांचा विचार केल्यास ते आता मोलमजुरीवर लागलेले आहे. एकेकाळी सोन्याचा धुर निघणार्या गावाला शासनाने पूर्णत: उध्वस्त करून सोडले आहे. या पोळा सनाला केवळ एकच बैलजोडी पोळय़ात होती तर पुढल्या पोळय़ात ही सुध्दा बैलांची जोडी पहावयास मिळते की नाही? यामुळे येणार्या पुढील भविष्यात बैल, गाय, किंवा गोवंश हे केवळ चित्रातच दाखवावे लागेल की काय? अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे. सध्या सर्वच ठिकाणी शेतीत कोणत्याही कामासाठी बैलच नसल्याने ट्रॅक्टर सारख्या यंत्रानेच शेती करून घ्यावी लागते. यामुळे बैल प्रजाती नष्ट होण्याच्याच मार्गावर असल्याचे चित्र दिसत असून यामध्ये शासनाचा फार मोठा वाटा आहे. कारण शासन अनेक बाबीसाठी कर्ज वगैरे देते. परंतु बैलासारख्या प्रजातीची वाढ कशी होईल यावर मात्र पूर्णत: दुर्लक्षितपणा करीत असल्यानेच ही वेळ आल्याचे आज चित्र दिसत आहे.
एकीकडे शेकडो बैलजोड्या असण्यार्या व तालुक्यात सुपिक जमिनीसाठी प्रसिद्ध असणार्या तालुक्यातील सावंगा बुजरूग या गावात शेकडो शेतकरी सुद्धा होते. परंतु बेंबळा प्रकल्पाच्या भकास धोरणामुळे हे गाव पार लयास गेल्याचे चित्र ह्या पोळय़ावरून दिसत आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यात एकेकाळी सुपिक जमिनीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावंगा बुजरूग या गावात शंभर ते दोनशे शेतकरी तर दोन-तिनशे बैलजोड्या होत्या व ह्या गावात पोळय़ाच्या मानासाठी व अस्तित्वासाठी दोन गटात नेहमी वादंग व्हायचे. याच सावंबा बु. गावाला बेंबळा प्रकल्पाने पूर्णत: खिळखिळे केले अाहे. ह्या गावात शंभर-शंभर एकर शेती, दोन-दोन तीन-तीन बैलजोड्या, शेकडो गाई असायच्या. या गावाचा बेंबळा प्रकल्पात समावेश झाल्याने येथे आता सुरेशराव सोळंके, मनोज कडू, संतोष सोळंके, बंडू मेटकर, सुनिल सोळंके, रामदासजी सोळंके, रमेश देवपारे, नानाजी तायवाडे एवढे बोटावर मोजण्याएवढे शेतकरी राहिले असून त्यांच्याकडे नव्याने घेतलेली जमीन सुध्दा खूपच अल्प प्रमाणात आहे. इतर शेतकर्यांचा विचार केल्यास ते आता मोलमजुरीवर लागलेले आहे. एकेकाळी सोन्याचा धुर निघणार्या गावाला शासनाने पूर्णत: उध्वस्त करून सोडले आहे. या पोळा सनाला केवळ एकच बैलजोडी पोळय़ात होती तर पुढल्या पोळय़ात ही सुध्दा बैलांची जोडी पहावयास मिळते की नाही? यामुळे येणार्या पुढील भविष्यात बैल, गाय, किंवा गोवंश हे केवळ चित्रातच दाखवावे लागेल की काय? अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे. सध्या सर्वच ठिकाणी शेतीत कोणत्याही कामासाठी बैलच नसल्याने ट्रॅक्टर सारख्या यंत्रानेच शेती करून घ्यावी लागते. यामुळे बैल प्रजाती नष्ट होण्याच्याच मार्गावर असल्याचे चित्र दिसत असून यामध्ये शासनाचा फार मोठा वाटा आहे. कारण शासन अनेक बाबीसाठी कर्ज वगैरे देते. परंतु बैलासारख्या प्रजातीची वाढ कशी होईल यावर मात्र पूर्णत: दुर्लक्षितपणा करीत असल्यानेच ही वेळ आल्याचे आज चित्र दिसत आहे.
Post a Comment