BREAKING NEWS

Saturday, September 3, 2016

देवसंस्कृती भोगवादी झाल्यानेच विनाशाकडे वाटचाल होत आहे ! - श्री. वासुदेवराव राठोड, गायत्री परिवार

राजुरा - सध्या हिंदूंसाठी कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. मुले आई-वडिलांना मम्मी-पप्पा असे म्हणतात. खरेतर मुलांवर संस्कार करायला आई-वडीलच न्यून पडत आहेत. आपली संस्कृती ही देवसंस्कृती आहे; पण ती आता भोगवादी संस्कृती झालेली आहे. आपण विनाशाकडे जात आहोत, असे प्रतिपादन गायत्री परिवाराचे साधक श्री. वासुदेवराव राठोड यांनी केले. येथे ३० ऑगस्ट या दिवशी झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती चौधरी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. २१५ धर्माभिमान्यांनी मेळाव्याचा लाभ घेतला.
       आज स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे. प्रशिक्षण घेतल्यानेच त्यांच्यात अत्याचाराला प्रतिकार करण्याची मानसिकता निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती चौधरी यांनी केले.
       श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी सांगितले, प्रत्येक जण आज सामाजिक दुष्प्रवृत्तींचा अनुभव घेत आहे; मात्र तरीही सगळे मूग गिळून गप्प आहेत. भ्रष्टाचाराने प्रत्येक क्षेत्रात परिसीमा गाठली आहे. यातच धर्मनिरपेक्षतेच्या धोरणामुळे धार्मिक समस्यांनीही उच्छाद मांडला आहे. यावर एकच उपाय म्हणजे हिंदूंचे संघटन करून सनातन धर्म राज्य म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करणे होय.
       गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश श्री. विनोद कोंगरे यांनी, तर महर्षींचा संदेश श्री. नामदेव उरकुडे यांनी वाचून दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.